शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नव्या ठाण्याचा प्रस्ताव अपुर्णतेमुळे केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.मागील काही वर्षांमध्ये परभणी शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.मागील काही वर्षांमध्ये परभणी शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे असले तरी पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या मात्र ३० वर्षांपूर्वी जी होती तेवढीच आहे. शहराचा विस्तार वाढत चालल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी- कर्मचाºयांवर ताण वाढत आहे. पोलीस प्रशासनातील कामकाजात सुसूत्रता यावी, या उद्देशाने शहरात आणखी एक पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन एम.आय.डी.सी. परिसरात नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. जिल्हा पोलीस दलाने काही महिन्यांपूर्वीच नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावात अनेक त्रुटी आढळून आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाने या प्रकरणी पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे कळविण्यात आले आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पोलीस ठाणे निर्मितीच्या हालचालीला गती येणार आहे.तीन पोलीस : ठाण्यांची विभागणीपरभणी शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यासाठी तीन पोलीस ठाण्यांमधील भागाचे विभाजन केले जाणार आहे. त्यात नवा मोंढा पोलीस ठाणे, ताडकळस पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचा समावेश आहे. या तिन्ही पोलीस ठाण्यांतील काही भाग कमी करुन तो एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यातील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.भागनिहाय प्रस्तावाची आवश्यकताजिल्हा पोलीस प्रशासनाने नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव सादर करताना कोणत्या पोलीस ठाण्यातील कोणता भाग नवीन पोलीस ठाण्यात समाविष्ट करावयाचा आहे, याविषयीचा सविस्तर प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून समाविष्ट होणाºया भागातील नागरिकांकडून हरकती, दावे मागविले जातील. त्यानंतरच हा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्तावाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPolice Stationपोलीस ठाणेMIDCएमआयडीसी