शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी : सौर कृषीपंप योजनेत २१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:00 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.परभणी जिल्हा हा सुपिक जमिनीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. जवळपास ३ लाख शेतकरी जिल्ह्यात आहेत. या शेतकºयांपैकी ९२ हजार शेतकºयांनी वीज वितरण कंपनीकडे विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल केले आहेत; परंतु, वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपधारक शेतकºयांना वीजपुरवठा करताना काटकसर केली जाते. कधी वीज गळतीचे कारण पुढे केले जाते. तर कधी वीज बिलाची थकबाकी असल्याचे सांगितले जाते. महावितरणच्या या प्रशासकीय घोळामध्ये कृषीपंपधारकांना ऐनवेळी वीजपुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांची पिके पाण्याअभावी हातची जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे.या सर्व प्रकारावर तोडगा काढण्यासाठी व शेतकºयांसाठी वरदान ठरणारी व शाश्वत विजेचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. ही योजना तीन वर्षे चालणार असून या योजनेत लाभार्थी शेतकºयाला तीनही वर्षापर्यंत महावितणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करता येणार आहेत. १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे येत्या काळात या योजनेतील प्रस्तावांची संख्या वाढणार आहे.नांदेड परिमंडळात ७८ शेतकºयांचा समावेशनांदेड परिमंडळातील ७८ शेतकºयांनी सात दिवसांत सौर कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १८, परभणी जिल्ह्यातील २१ तर सर्वाधिक हिंगोली जिल्ह्यातील ३९ शेतकºयांचा समावेश आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून ६४ तर अनुसूचित जातीतील १० तसेच अनुसूचित जमातीतील ४ शेतकºयांचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्री