शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

परभणी : बोरगव्हाण येथील रेशीम शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:55 IST

मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ वर्षापासून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुती लागवड आणि शेड बांधकाम करण्यासाठी अनुदान योजना सुरू केली. ९० हजार रुपये शेड बांधकाम आणि २ लाख रुपये शेतात तुती लागवड आणि व्यवस्थापन असे २ लाख ९५ हजार रुपये अनुदान दिल्या जाते. तुती लागवडीचा कार्यक्रम ३ वर्षे असून ३ वर्षात अनुदान वितरित केले जाते. मात्र पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांना शेड बांधकामाचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. या योजनेसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून तालुक्यातील बोरगव्हाण येथे २०१६-१७ या वर्षात २२ शेतकºयांना रेशीम विभागाने तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी मान्यता दिली होती. मात्र शेतकºयांचा ३ वर्षाचा अनुदान कालावधी गत वर्षी संपला आहे. येथील ९ शेतकºयांनी २ वर्षापूर्वी तुती सोबत शेतात रेशीम शेड उभारणी केली आहे. बांधकाम झाल्यानंतर बिल सादर करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये बांधकामाचे ९ लाभार्थी शेतकºयांचे प्रत्येकी ४५ हजार प्रमाणे ४ लाख ५ हजार रुपयांची देयके तहसील कार्यालयामध्ये आॅनलाईन दाखल झाली आहेत. मात्र ती शेतकºयांना कुशल देयके प्राप्त झाली नाहीत.शेतकºयांची जिल्हाधिकाºयांकडे धाव४पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकºयांना तीन वर्षापूर्वी शेड बांधकाम केल्याचे अनुदान मिळाले नाही. विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी केंद्रशासनासह राज्यशासन व शासकीय यंत्रणा सरसावल्या असताना दुसरीकडे मात्र स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून केलेल्या बांधकामाचेही पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाही.४त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकºयांनी केली आहे. निवेदनावर नितीन इंगळे, भागवत इंगळे, केशवराव इंगळे, दत्तराव खुडे, सुखदेव शिंदे, राधेश्याम खुडे, संतोष अवताडे, परमेश्वर इंगळे, नारायण शिंदे ,वैभव खुडे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी