शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

परभणी : बोरगव्हाण येथील रेशीम शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:55 IST

मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी राज्य शासनाने अनुदान योजना सुरू केली असली तरी योजनेची कामे करूनही उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोरगव्हाण येथील ९ शेतकऱ्यांची शेड बांधकामाची ४ लाख रुपयांची कुशल देयके वर्षभरापासून रखडली असल्याने लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत.रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ वर्षापासून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तुती लागवड आणि शेड बांधकाम करण्यासाठी अनुदान योजना सुरू केली. ९० हजार रुपये शेड बांधकाम आणि २ लाख रुपये शेतात तुती लागवड आणि व्यवस्थापन असे २ लाख ९५ हजार रुपये अनुदान दिल्या जाते. तुती लागवडीचा कार्यक्रम ३ वर्षे असून ३ वर्षात अनुदान वितरित केले जाते. मात्र पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील लाभार्थी शेतकºयांना शेड बांधकामाचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. या योजनेसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून तालुक्यातील बोरगव्हाण येथे २०१६-१७ या वर्षात २२ शेतकºयांना रेशीम विभागाने तुती लागवड आणि शेड बांधकामासाठी मान्यता दिली होती. मात्र शेतकºयांचा ३ वर्षाचा अनुदान कालावधी गत वर्षी संपला आहे. येथील ९ शेतकºयांनी २ वर्षापूर्वी तुती सोबत शेतात रेशीम शेड उभारणी केली आहे. बांधकाम झाल्यानंतर बिल सादर करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये बांधकामाचे ९ लाभार्थी शेतकºयांचे प्रत्येकी ४५ हजार प्रमाणे ४ लाख ५ हजार रुपयांची देयके तहसील कार्यालयामध्ये आॅनलाईन दाखल झाली आहेत. मात्र ती शेतकºयांना कुशल देयके प्राप्त झाली नाहीत.शेतकºयांची जिल्हाधिकाºयांकडे धाव४पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकºयांना तीन वर्षापूर्वी शेड बांधकाम केल्याचे अनुदान मिळाले नाही. विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी केंद्रशासनासह राज्यशासन व शासकीय यंत्रणा सरसावल्या असताना दुसरीकडे मात्र स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून केलेल्या बांधकामाचेही पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाही.४त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकºयांनी केली आहे. निवेदनावर नितीन इंगळे, भागवत इंगळे, केशवराव इंगळे, दत्तराव खुडे, सुखदेव शिंदे, राधेश्याम खुडे, संतोष अवताडे, परमेश्वर इंगळे, नारायण शिंदे ,वैभव खुडे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी