शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

परभणी : पालम तालुक्यात वृक्षांची बेसुमार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यात मागील काही दिवसांपासून वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़ वन विभागाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील काही दिवसांपासून वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़ वन विभागाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असून, कारवाई करण्याऐवजी कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत आहेत़ त्यामुळे शासकीय यंत्रणेचा कसलाही अंकुश वृक्ष तोड करणाऱ्यांवर राहिलेला नाही़पालम तालुक्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ कमी पाऊस पडल्याने शेतकºयांचा खरीप व रबी दोन्ही हंगाम हातचे गेले असून, जागोजागी रानं मोकळी झाली आहेत़ याचाच फायदा घेत शिवारातील झाडांची कत्तल वाढली आहे़शासकीय यंत्रणा जून महिना येताच वृक्ष लागवडीचा गाजावाजा मोठ्या थाटामाटात करते़ मात्र उन्हाळ्यात मात्र वृक्षतोड होत असताना त्याकडे कानाडोळा करीत आहे़ म्हणून बनवस येथील घटना ही अशाच वृक्षतोडीतून घडली होती़ पालम तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकºयांच्या बांधावरील शेतातील झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची यंत्रणा सक्रिय झालेली आहे़ शेतकºयांकडून कमी किमतीत झाडे विकत घेऊन त्याची तोड केली जात आहे़ विशेषत: ही झाडे तोडण्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाºयांना असूनही संबंधित कर्मचारी याकडे पाठ फिरवत आहेत़ पालम तालुक्यात वृक्षतोडीवर अंकुश ठेवण्याऐवजी वृक्ष तोडणाºया लोकांकडून वसुली करण्यातच कर्मचारी मशगुल झाले आहेत़ वृक्षतोडीची तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते़ तसेच तक्रारदारांना दमदाटी केली जात असून, दिवसेंदिवस वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ होत आहे़ यामुळे पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेले वृक्ष तोडले जात असल्याने अनेक गावचे शिवार उजाड झाले आहेत़ तालुक्यातील वृक्षतोडीची तातडीने चौकशी करून वन विभागाच्या दोषी कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जि़प़ सदस्य पार्वतीताई वाघमारे, शंकर वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.लाकूडतोड्यांना वन विभागाचे अभय४पालम तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत़ या वीटभट्ट्यांना दररोज शेकडो टन लाकूड लागत असते़ त्यामुळे तालुक्यात वृक्षतोडीचा व्यवसाय तेजीत आहे़ वन विभागाच्या कर्मचाºयांचे वृक्षतोड करणाºयांशी अर्थपूर्ण संबंध आहे. त्यामुळे वृक्षतोड करताना कसली भीती बाळगली जात नाही़, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. उलट वनविभागाचे कर्मचारी तक्रारदारांनाच धमकावत असल्याने अनेक जण तक्रार करताना हात आखडता घेत आहेत. परिणामी तालुक्यात राजरोसपणे वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़पालम शहरातून लाकडाची वाहतूकग्रामीण भागातील तोडलेल्या लाकडांची दिवसभर पालम शहरातून बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे़ अनेकदा लाकडे भरून आलेल्या वाहनांच्या पाठीमागे शासकीय योजनेतील बड्या अधिकाºयांच्या वाहनांचा ताफा उभा असतो़; परंतु, अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत़ त्यामुळे वृक्षतोड करणाºयांना कोणीचीही भीती राहिलेली नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीforest departmentवनविभाग