शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘पीएम’चे जिंतूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:09 IST

पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांना पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर त्यांची नावे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोर्टलवरील पात्र शेतकºयांना तीन महिन्यांतून एक वेळा २ हजार रुपये या प्रमाणे लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सुमारे सव्वा तीन लाख शेतकरी असले तरी प्रत्यक्षात पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर २ लाख ९१ हजार ४७७ शेतकºयांची नावे अपलोड झाली असून, या शेतकºयांना मानधन दिले जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेतील शेतकºयांची तालुकानिहाय संख्या जाहीर केली.मध्यंतरी आधार क्रमांकाच्या आधारावरच शेतकºयांना लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट असणाºया शेतकºयांची संख्या नुकतीच जाहीर केली आहे. या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्यातील केवळ १८ हजार २४० शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.३१ डिसेंबरपासून या शेतकºयांना आधार क्रमांकावर आधारित मानधनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकºयांची नावे आधार क्रमांकानुसार अपडेट करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यास शेतकºयांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, निम्म्याहून अधिक शेतकºयांनी आपली नावे आधार क्रमांकानुसार अपडेट केली आहेत. त्यामुळे हे शेतकरी किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. आधार अपलोडींग शिल्लक असणाºया शेतकºयांनी आधार क्रमांक अपलोड केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.आधार संकलनाचे काम सुरूच४पीएम किसान योजनेमध्ये आधार क्रमांक नसलेल्या शेतकºयांची संख्या सुरुवातीला ८० हजार पेक्षाही अधिक होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गावा-गावात योजनेची जनजागृती करुन शेतकºयांना त्यांचे आधार क्रमांक आणि आधार क्रमांकानुसार पीएम किसान पोर्टलवरील शेतकºयाचे नाव अपडेट करुन घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातूनही शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करण्यात आले. त्याचा परिणाम निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित झाले असून, आता केवळ १२ हजार शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करणे शिल्लक आहेत. या शेतकºयांचे आधार क्रमांक संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. ज्या शेतकºयांची नावे आधारनुसार अपडेट झाली नाहीत ते शेतकरी मानधन योजनेपासून वंचित राहू शकतात. तेव्हा शेतकºयांना अजूनही संधी असून, त्यांनी आधार क्रमांक आणि आधार नुसार त्यांची नावे अपडेट करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी