शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:40 IST

पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़दरवर्षी उन्हाळ्यात पालम शहराला पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो़ या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी गोदावरी नदीतील पाणी आटल्यानंतर आणि भूजल पातळी खोल गेल्यानंतर पालम शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होत आहे़ त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये मंजूर झाले असून, १६ जून रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून या योजनेसाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून, एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़पालम शहरवासियांना दरवर्षी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते़ पालम शहर आणि परिसरात मोठा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते़ त्यावर मात करण्यासाठी आता लोहा तालुक्यातून शहरासाठी पाणी घेतले जाणार आहे़ साधारण: १५० किमी अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे़ विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ मुंबई येथील घुले कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून, २४ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करावयाचे आहे़ त्यामुळे दोन वर्षामध्ये पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्याची चिन्हे आहेत़योजनेंतर्गत होणारी कामेलोहा तालुक्यातील लिंबोटी धरणापासून ते पालम शहरातील जलकुंभापर्यंतची कामे या योजनेंतर्गत केली जाणार आहेत़ त्यात मुख्य उद्भव विहीर, पंप घर, अशुद्ध जलपम्पिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलशुद्धीकरण केंद्र आणि उंच सलोह टाक्यांची उभारणी केली जाणार आहे़ या अंतर्गत उद्भव विहिरीच्या कामाचे मार्कआऊटही कंत्राटदारास देण्यात आले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़व्ही़ कायंदे यांनी दिली़ग्रीड पद्धतीने होणार कामपालमसाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ यात अंतर्गत जलवाहिनीचा समावेश नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले़प्रती माणसी ४० लिटर पाण्याचे केले नियोजनपालम शहराची सध्याची लोकसंख्या ९४ हजार ४८७ एवढी असून, २०३४ मध्ये ही लोकसंख्या १ लाख १७ हजार १६० एवढी होईल, अशी अपेक्षा गृहित धरून १५ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे़ या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ४० लिटर पाणी दिले जाणार असून, दररोज या योजनेतून पालम शहराला ६़१७६ दललि पाणी मिळणार आहे़ त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहरवासियांची पाणीटंचाई दूर होईल़चारठाणा योजनेचे काम अंतिम टप्प्यातजिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंर्गत ४ कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना उभारली जात आहे़ ही योजनाही १५ वर्षांची असून, १२ हजार ५९२ लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ जुलै २०१८ मध्ये या योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली़ चारठाणा तलावातील बुडीत क्षेत्रातून गावासाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेच्या निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेशही दिले जाणार आहेत़ २ उद्भव विहीर, उद्धरण वाहिनी, जलकुंभ आणि अंतर्गत वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई