शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:40 IST

पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़दरवर्षी उन्हाळ्यात पालम शहराला पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो़ या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी गोदावरी नदीतील पाणी आटल्यानंतर आणि भूजल पातळी खोल गेल्यानंतर पालम शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होत आहे़ त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये मंजूर झाले असून, १६ जून रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून या योजनेसाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून, एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़पालम शहरवासियांना दरवर्षी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते़ पालम शहर आणि परिसरात मोठा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते़ त्यावर मात करण्यासाठी आता लोहा तालुक्यातून शहरासाठी पाणी घेतले जाणार आहे़ साधारण: १५० किमी अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे़ विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ मुंबई येथील घुले कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून, २४ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करावयाचे आहे़ त्यामुळे दोन वर्षामध्ये पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्याची चिन्हे आहेत़योजनेंतर्गत होणारी कामेलोहा तालुक्यातील लिंबोटी धरणापासून ते पालम शहरातील जलकुंभापर्यंतची कामे या योजनेंतर्गत केली जाणार आहेत़ त्यात मुख्य उद्भव विहीर, पंप घर, अशुद्ध जलपम्पिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलशुद्धीकरण केंद्र आणि उंच सलोह टाक्यांची उभारणी केली जाणार आहे़ या अंतर्गत उद्भव विहिरीच्या कामाचे मार्कआऊटही कंत्राटदारास देण्यात आले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़व्ही़ कायंदे यांनी दिली़ग्रीड पद्धतीने होणार कामपालमसाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ यात अंतर्गत जलवाहिनीचा समावेश नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले़प्रती माणसी ४० लिटर पाण्याचे केले नियोजनपालम शहराची सध्याची लोकसंख्या ९४ हजार ४८७ एवढी असून, २०३४ मध्ये ही लोकसंख्या १ लाख १७ हजार १६० एवढी होईल, अशी अपेक्षा गृहित धरून १५ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे़ या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ४० लिटर पाणी दिले जाणार असून, दररोज या योजनेतून पालम शहराला ६़१७६ दललि पाणी मिळणार आहे़ त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहरवासियांची पाणीटंचाई दूर होईल़चारठाणा योजनेचे काम अंतिम टप्प्यातजिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंर्गत ४ कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना उभारली जात आहे़ ही योजनाही १५ वर्षांची असून, १२ हजार ५९२ लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ जुलै २०१८ मध्ये या योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली़ चारठाणा तलावातील बुडीत क्षेत्रातून गावासाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेच्या निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेशही दिले जाणार आहेत़ २ उद्भव विहीर, उद्धरण वाहिनी, जलकुंभ आणि अंतर्गत वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई