शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:40 IST

पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़दरवर्षी उन्हाळ्यात पालम शहराला पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो़ या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी गोदावरी नदीतील पाणी आटल्यानंतर आणि भूजल पातळी खोल गेल्यानंतर पालम शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होत आहे़ त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये मंजूर झाले असून, १६ जून रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून या योजनेसाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून, एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़पालम शहरवासियांना दरवर्षी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते़ पालम शहर आणि परिसरात मोठा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते़ त्यावर मात करण्यासाठी आता लोहा तालुक्यातून शहरासाठी पाणी घेतले जाणार आहे़ साधारण: १५० किमी अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे़ विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ मुंबई येथील घुले कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून, २४ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करावयाचे आहे़ त्यामुळे दोन वर्षामध्ये पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्याची चिन्हे आहेत़योजनेंतर्गत होणारी कामेलोहा तालुक्यातील लिंबोटी धरणापासून ते पालम शहरातील जलकुंभापर्यंतची कामे या योजनेंतर्गत केली जाणार आहेत़ त्यात मुख्य उद्भव विहीर, पंप घर, अशुद्ध जलपम्पिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलशुद्धीकरण केंद्र आणि उंच सलोह टाक्यांची उभारणी केली जाणार आहे़ या अंतर्गत उद्भव विहिरीच्या कामाचे मार्कआऊटही कंत्राटदारास देण्यात आले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़व्ही़ कायंदे यांनी दिली़ग्रीड पद्धतीने होणार कामपालमसाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ यात अंतर्गत जलवाहिनीचा समावेश नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले़प्रती माणसी ४० लिटर पाण्याचे केले नियोजनपालम शहराची सध्याची लोकसंख्या ९४ हजार ४८७ एवढी असून, २०३४ मध्ये ही लोकसंख्या १ लाख १७ हजार १६० एवढी होईल, अशी अपेक्षा गृहित धरून १५ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे़ या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ४० लिटर पाणी दिले जाणार असून, दररोज या योजनेतून पालम शहराला ६़१७६ दललि पाणी मिळणार आहे़ त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहरवासियांची पाणीटंचाई दूर होईल़चारठाणा योजनेचे काम अंतिम टप्प्यातजिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंर्गत ४ कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना उभारली जात आहे़ ही योजनाही १५ वर्षांची असून, १२ हजार ५९२ लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ जुलै २०१८ मध्ये या योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली़ चारठाणा तलावातील बुडीत क्षेत्रातून गावासाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेच्या निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेशही दिले जाणार आहेत़ २ उद्भव विहीर, उद्धरण वाहिनी, जलकुंभ आणि अंतर्गत वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई