शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

परभणी : पीकविमा प्रकरणी न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:11 IST

२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते़ मात्र विमा कंपनीच्या धोरणांमुळे शेतकºयांना विमा भरपाई मिळाली नाही़ ७ लाख ६११ शेतकºयांनी ३१ कोटी ५९ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ त्यामुळे ४ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी १४१८़०७ कोटी रुपये विमा संरक्षण देणे अपेक्षित होते़ मात्र विमा कंपनीने केवळ १४८ कोटी रुपये विमा भरपाई वाटप केली़ लिमला, बाभळगाव, आवलगाव आदी महसूल मंडळात उत्पन्नात घट झाली असतानाही शेतकºयांना विम्यापासून वंचित ठेवण्यत आले होते़ या सर्व प्रश्नांवर आंदोलनेही करण्यात आली़ त्यावेळी शासनाने विमा भरपाई देण्याचे आश्वासन दिले़ परंतु, त्याची पूर्तता मात्र केली नाही़या प्रश्नी शेतकरी संघर्ष समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, या याचिकेत केंद्र व राज्य सरकारसह रिलायन्स पीक विमा कंपनी, भारतीय विमा प्राधिकरणाला प्रतिवादी करण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे़पीक विमा प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे़ या याचिकेतून वंचित शेतकºयांना पीकविमा देण्याबरोबरच राज्य शासनाच्या विमा भरपाई देण्याच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित शेतकरी आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत, असे कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, रामकिशनराव दुधाटे यांनी सांगितले़ या प्रक्रियेसाठी एम़ आऱ काळे, सदाशिवआप्पा ढेले, जयसिंगआप्पा शिंदे, सचिन दुधाटे, विठ्ठल दुधाटे, आबासाहेब पवार, आबाराव दुधाटे, वसंत जोगदंड, सुरेश दुधाटे आदींनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयFarmerशेतकरी