शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परभणी : ‘शांतीदूत’चा आदर्श इतरांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:03 IST

पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.परभणी रेल्वे स्थानकावर शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या थंड आणि शुद्ध पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन खा.बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक सुभाषचंद्र सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिनेश भुतडा, प्रणव भंडारी, भगीरथ सोमाणी, सुभाष काबरा, सत्यनारायण चांडक, श्रीराम तापडिया, राजेश येरावार, कांतीलाल झांबड, सुरेंद्र सोमाणी, हनुमानदास बजाज, सत्यनारायण मंत्री, केशव सारडा, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पुरुषोत्तम धूत, नंदलाल सोनी, केदारनाथ सारडा, दीपक भंडारी, दुर्गादास बंग, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सुभाषचंद्र सारडा म्हणाले, शांतीदूत संस्था दरवर्षी प्रवाशांची तहान भागविण्यासाठी जलयज्ञ करीत आहे. प्रवाशांमध्येच ईश्वरांचा अंश असल्याने तहानलेल्या जिवांसाठी हा यज्ञ सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शांतीदूतचे पदाधिकारी, रेल्वे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRailway Passengerरेल्वे प्रवासीMember of parliamentखासदार