शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

परभणी : तीन वर्षांपासून अडकली रेशीम उत्पादकांची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:19 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी केंद्र व राज्य शासनाने २००८ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत काही वर्षे शेतमजूर, शेतकºयांना फायदा झाला. मात्र त्यानंतर ही योजना राबवणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासीन भूमिकेमुळे योजनेस मरगळ आली. एखादे काम मंजूर झाले तर लालफितीच्या कारभारामुळे त्या कामाला दुसरे वर्ष उजाडत असल्याचेही पुढे आले.त्यातच राज्य शासनाने रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१७ पासून रेशीम शेतीचा समावेश केला. योजनेच्या पहिल्याच वर्षी पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील १७ शेतकºयांनी या योजनेंतर्गत कामाचे प्रस्ताव दाखल केले.तहसील कार्यालय व जिल्हा रेशीम अधिकारी यांच्यामार्फत प्रति लाभार्थ्यांना ३ लाख रुपये अनुदानही मंजूर करण्यात आले होते. लाभार्थी शेतकºयांना तुती लागवडीसाठी मजुरीची देयके मिळाली. तसेच रेशीम शेडसाठी लागणारा खर्चही मिळाला.या शेतकºयांनी रेशीम शेड बांधकाम केल्यानंतर कोसला उत्पादनही सुरु केले आहे; परंतु, शेड बांधकामाचे १७ शेतकºयांचे तीन वर्षापासून ८ लाख रुपयांची देयके अडकली आहेत. शासनाकडून कुशल देयके वेळेत दिली जात नसल्याने शेतकरी या योजनेपासून दूर जावू लागले आहेत.येथील शेतकºयांचे रेशीमसाठीचे कुशल देयके कार्यालयात सादर केले आहेत. मात्र शासनाकडून अद्याप शेतकºयांना आॅनलाईन पेमेंट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सिंचन विहिरींची ८८ लाख रुपयांची देयके अडकलीमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती बरोबरच सिंचन विहिरींचीही मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. या कामातून गावातील मजुराला गावातच काम मिळते. त्याच बरोबर लाभार्थी शेतकºयाला सिंचनाचीही सोय उपलब्ध होते. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांचे रुपडे पालटणारी ठरत असल्याचे काही वर्षांपूर्वी वाटत होते; परंतु, लालफितीच्या कारभारामुळे या योजनेविषयी आता शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे २०१७-१८ या वर्षात सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेल्या ७२ शेतकºयांचे ८८ लाख रुपयांचे कुशल देयके गेल्या सहा महिन्यांपासून अडकली आहेत. कुशल देयके वेळेत मिळत नसल्याने लाभार्थी शेतकरी आर्थिक कोंडित सापडला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी