शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन वर्षांपासून अडकली रेशीम उत्पादकांची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:19 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी केंद्र व राज्य शासनाने २००८ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत काही वर्षे शेतमजूर, शेतकºयांना फायदा झाला. मात्र त्यानंतर ही योजना राबवणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासीन भूमिकेमुळे योजनेस मरगळ आली. एखादे काम मंजूर झाले तर लालफितीच्या कारभारामुळे त्या कामाला दुसरे वर्ष उजाडत असल्याचेही पुढे आले.त्यातच राज्य शासनाने रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१७ पासून रेशीम शेतीचा समावेश केला. योजनेच्या पहिल्याच वर्षी पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील १७ शेतकºयांनी या योजनेंतर्गत कामाचे प्रस्ताव दाखल केले.तहसील कार्यालय व जिल्हा रेशीम अधिकारी यांच्यामार्फत प्रति लाभार्थ्यांना ३ लाख रुपये अनुदानही मंजूर करण्यात आले होते. लाभार्थी शेतकºयांना तुती लागवडीसाठी मजुरीची देयके मिळाली. तसेच रेशीम शेडसाठी लागणारा खर्चही मिळाला.या शेतकºयांनी रेशीम शेड बांधकाम केल्यानंतर कोसला उत्पादनही सुरु केले आहे; परंतु, शेड बांधकामाचे १७ शेतकºयांचे तीन वर्षापासून ८ लाख रुपयांची देयके अडकली आहेत. शासनाकडून कुशल देयके वेळेत दिली जात नसल्याने शेतकरी या योजनेपासून दूर जावू लागले आहेत.येथील शेतकºयांचे रेशीमसाठीचे कुशल देयके कार्यालयात सादर केले आहेत. मात्र शासनाकडून अद्याप शेतकºयांना आॅनलाईन पेमेंट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सिंचन विहिरींची ८८ लाख रुपयांची देयके अडकलीमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती बरोबरच सिंचन विहिरींचीही मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. या कामातून गावातील मजुराला गावातच काम मिळते. त्याच बरोबर लाभार्थी शेतकºयाला सिंचनाचीही सोय उपलब्ध होते. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांचे रुपडे पालटणारी ठरत असल्याचे काही वर्षांपूर्वी वाटत होते; परंतु, लालफितीच्या कारभारामुळे या योजनेविषयी आता शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे २०१७-१८ या वर्षात सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेल्या ७२ शेतकºयांचे ८८ लाख रुपयांचे कुशल देयके गेल्या सहा महिन्यांपासून अडकली आहेत. कुशल देयके वेळेत मिळत नसल्याने लाभार्थी शेतकरी आर्थिक कोंडित सापडला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी