शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

परभणी : प्रवाशांना मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:51 IST

परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.परभणी-जिंतूर रस्त्याचे काम दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे़ हे काम करीत असताना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व्यवस्थित न केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे व धूळ निर्माण झाली आहे़ परिणामी वाहनधारकांना दिवसा वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत आहे़ यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ याशिवाय दुचाकी वाहनांना तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे़ या सर्व प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून, संबंधिताने पर्यायी मार्गाचे कोणतेही नियम न पाळल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे़जिंतूर-औंढा रस्त्यावरही प्रचंड खड्डे पडले आहेत़ मागील वर्षी या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते़ अवघ्या सहा महिन्यांतच जिंतूर ते पुंगळा, पुंगळा ते आडगाव फाटा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्डा चुकविताना अनेक अपघात होत आहेत़ विशेष म्हणजे, या रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च होवूनही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’च आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अशीच परिस्थिती जिंतूर-येलदरी या मार्गावरही झाली आहे़ या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रवास करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ या मुख्य रस्त्याप्रमाणेच तालुक्याला जोडणाºया अनेक डांबरी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे़ या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वीच झालेला खर्च वायफळ गेला असून, सा़बां़ विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे़नेत्यांची चुप्पी४तालुक्यातील विविध रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्दही काढलेला नाही़ विशेष म्हणजे, जिंतूर-परभणी या रस्त्यावरील प्रवाशांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत़ परंतु, राजकीय पक्ष गप्प का? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे़४अशीच अवस्था जिंतूर-औंढा या रस्त्याची झाली आहे़ सहा महिन्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे सा़बां़ विभागाने बुजविले होते़ आज मात्र या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनधारकांना कठीण झाले आहे़ याकडेही राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते़

टॅग्स :parabhaniपरभणी