शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

परभणी : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:04 IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़पक्ष निष्ठा बाजुला ठेवून सोयीचे राजकारण करण्याचा ‘परभणी पॅटर्न’ गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात बिनदिक्कतपणे सुरू आहे़ विरोधी पक्षातील नेत्याचा पराभव करण्याऐवजी स्वपक्षीयांची खेचाखेची करून त्यांचेच पानीपत करण्याची उठाठेव अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ त्यामुळेच आजपर्यंत परभणीला राज्यस्तरावरील नेता मिळू शकलेला नाही़ राजकारणात वैयक्तीत मतभेद असू शकतात़ सार्वजनिक जीवनात काम करीत असताना विचारभिन्नता असणे स्वाभावीक आहे; परंतु, जिल्ह्याच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे़ प्रत्येक निवडणुकीत सातत्याने आढळणारा हा गुण या विधानसभा निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवू लागला आहे़जिल्ह्याने काही दिवसांपुर्वीच तसा लोकसभेलाही अनुभव घेतला होता़ आता विधानसभेची निवडणूक १९ किंवा २० सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत़ गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळविलेल्या शिवसेनेतही पहिल्या निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय हेवेदाव्याच राजकारण आजही कायम आहे़ या राजकारणात अनेक नेते मंडळींचे राजकीय करीअर संपून गेले़ तर अनेकांनी करीअरही केले; परंतु, परिस्थितीमध्ये मात्र बदल होत नाही़ जिल्ह्यात सद्यस्थितीतही शिवसेनेचे खा़ बंडू जाधव व आ़ डॉ़ राहुल पाटील यांचे दोन गट कायम असून, हे दोन गट एकमेकास आजही पाण्यात पाहत आहेत़ कुरघोडी करण्याची संधी त्यांच्याकडून सोडली जात नाही़ अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून येत आहे़ जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी व शहराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत़ लोकसभा निवडणुकीला त्याचा परभणीकरांना प्रत्यय आला आहे़ आता विधानसभेला पुन्हा हे मतभेद चर्चेला आले आहेत़ निमित्त ठरले आहे, परभणी विधानसभेच्या जागेचे़ आ़ दुर्राणी यांनी काँग्रेसकडून सुरेश नागरे यांना परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यास तिव्र विरोध केला आहे तर अ‍ॅड़ परिहार यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील़ त्यामुळे युतीच्या उमेदवाराला फायदा होईल, असे स्टेटमेंट करून वातावरण गढूळ करू नका, असा सल्ला दुर्राणी यांना दिला आहे़काँग्रेस पक्षातही फारसे आलबेल नाही़ या पक्षातील नेत्यांमध्येही तीव्र मतभेद आहेत़ अशातच काँग्रेस पक्षाला जिल्हाभरात एकसंघतेने बांधून ठेवणारा नेता मिळेनासा झाला आहे़ त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत़ परिणामी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका सोयीने ठरविली जात आहे़ राज्य व राष्ट्रीय पातळीवर सत्तेत असलेला भाजपाही याला अपवाद नाही़ उघड-उघड या पक्षातील नेते बोलत नसले तरी खाजगीमध्ये ते एकमेकांची खेचाखेची करण्याची संधी सोडत नाहीत़ त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची होते़ जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते आपसातील मतभेद बाजुला सारून कधी विधानभवनात तर कधी देवगिरी एक्सप्रेसमध्ये तर कधी मंत्रालयात हास्यविनोद करताना दिसून येतात़ इकडे कार्यकर्ते मात्र एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात़ त्यातूनच आक्रमक भूमिका घेवून हाणामाऱ्यांचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत़ या निवडणुकीतही असाच काहीसा अनुभव जिल्ह्याला येत असला तरी त्यामध्ये सुधारणा होण्याचीही शक्यता वाटत नाही़ प्रामाणिक कार्यकर्त्यां संदर्भात एक शायर म्हणतात़़़ भरे बाजार में अक्सर खाली हात लौंट आता हूं़़़ पहले पैसे नही थे अब ख्वाईशे नही रही़़़असे आहेत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मतभेद४जिल्ह्यात शिवसेनेत खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद आहेत़ भाजपात माजी आ़ विजय गव्हाणे आणि महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्यात मतभेद आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी आणि महानगराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यात मतभेद आहेत़ तसेच गंगाखेडचे आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत़काँग्रेसमध्ये सर्व स्वतंत्रच४जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील मतभेद हा जाहीरपणे चर्चेचा फारसा विषय झाला नसला तरी या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येही बरेच मतभेद आहेत़ जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या मनपातील भूमिकेला अनेक वेळा त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला आहे़ दुसरीकडे काँग्रेसच्याच चिन्हावर निवडून आलेले गंगाखेड आणि सोनपेठचे नगराध्यक्ष कधीही काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसत नाहीत़ तसा विषयही कधी जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी केला नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019