शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

परभणी : मनपाच्या नियोजनाअभावी परभणीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:05 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार नदीपात्रात सोडलेले पाणी राहटी बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणे गरजेचे होते. मात्र महानगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर २० ते २२ दिवसांतून एकवेळा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलवाहिनी जागोजागी फुटली आहे. त्यामुळे नळाला पाणी सोडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे पाणी उपलब्ध होत नसताना परभणी शहरातील रस्त्यांवर मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याचे पहावयास मिळते. महापालिकेने जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते; परंतु, गळतीही दुरुस्त केली नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरुच आहे. शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासल्लाी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी वारंवार मागणी करुनही मनपाचे प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शासनाने टंचाई काळात पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या असतानाही परभणी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी