शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मनपाच्या नियोजनाअभावी परभणीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:05 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार नदीपात्रात सोडलेले पाणी राहटी बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणे गरजेचे होते. मात्र महानगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर २० ते २२ दिवसांतून एकवेळा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलवाहिनी जागोजागी फुटली आहे. त्यामुळे नळाला पाणी सोडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे पाणी उपलब्ध होत नसताना परभणी शहरातील रस्त्यांवर मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याचे पहावयास मिळते. महापालिकेने जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते; परंतु, गळतीही दुरुस्त केली नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरुच आहे. शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासल्लाी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी वारंवार मागणी करुनही मनपाचे प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शासनाने टंचाई काळात पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या असतानाही परभणी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी