शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी : दाट धुक्यांत परभणीतील रस्ते झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:58 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़यावर्षी तब्बल एक महिना उशिने थंडीला सुरुवात झाली आहे़ किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय घट होत असून, वातावरणात गारवा निर्माण होत आहे़ उत्तर भारतामध्ये हिमवृष्टी होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर होत आहे़ राज्याच्या सिमावर्ती भागातून थंड वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवत आहे़ दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे़ याच दरम्यान, बुधवारी पहाटे दाट धुके पसरले होते़ जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये धुक्याची चादर पसरल्याने पहाटे रस्ते धुक्यामध्ये गायब झाले होते़सकाळी ७ वाजेपर्यंत रस्त्यांवर धुके होते़ त्यामुळे या धुक्यातून वाट काढताना वाहनधारकांना चक्क हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली़ मंगळवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणात थंडी होती़ ठिक ठिकाणी शेकोट्या पेटवून आणि उबदार कपड्यांचा वापर करून थंडीपासून बचाव केला जात आहे़ वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळची कामे उशिराने सुरू होत असून, सायंकाळी ७ वाजेनंतर रस्ते सुनसान पडत आहेत़ दिवसभर गारवा असल्याने गारवा जाणवत आहे़१० वर्षानंतर आले पांढरे दाट धुके४परभणी जिल्ह्यात १० वर्षानंतर पहिल्यांदाच पांढरे दाट धुके बुधवारी पहाटे पसरल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ के़ के़ डाखोरे यांनी सांगितले़४वातावरणात वारा नसल्याने धुक्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली़ दवबिंदूचे धुक्यात रुपांतर झाले़ त्यामुळे कमी अंतरावरील दिसण्याची क्षमता कमी जानवली़, असेही यावेळी डॉ़ डाखोरे यांनी सांगितले़ बुधवारी सकाळी ८़३० वाजेपर्यंत शहर व परिसरात धुके दिसून आले़किमान तापमान ९़६ अंशावरजिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली असून, बुधवारी जिल्ह्याचे किमान तापमान ९़६ अंश एवढे निच्चांकी नोंद झाले आहे़ विशेष म्हणजे कमाल तापमानही २५ अंशापर्यंत पोहचले आहे़ यावर्षीच्या हिवाळ्यात १५ दिवसांपूर्वी पारा ९ अंशापर्यंत उतरला होता़ त्यानंतर बुधवारी पुन्हा तापमानात लक्षणीय घट झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीweatherहवामान