शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:15 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व ज्या नागरिकाकडे कच्चे बांधकाम असलेले घर आहे, त्या नागरिकाला केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून पक्के घर मिळावे, यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजनेला अंमलात आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला व प्रत्येक पंचायत समितींना प्रत्येकी एका वर्षाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार परभणी पंचायत समितीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४०५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार पंचायत परभणी समितीकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार परभणी तालुक्यातील ६३३ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ५६३ लाभार्थ्यांची परभणी पंचायत समिती प्रशासनाकडून जिओ टॅगिंग करण्यात आली. त्यातून ४०५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रति एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान चार हप्त्यात दिले जाते.३९५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्प्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली. दुसऱ्या हप्त्यातील रक्कम ३९५ पैकी ३४० लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली. त्यामुळे या लाभार्थ्यांची हक्काची घरे वेळेत पूर्ण होतील, अशी लाभार्थ्यांसह वरिष्ठ अधिकाºयांना अपेक्षा होती. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपून २०१७-१८ या वर्षातीलही पाच महिने पूर्णत्वास आले आहेत. मात्र परभणी पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यात या योजनेला मरगळ आल्याचेच दिसून येत आहे.गतवर्षीचे जिल्ह्याचे उद्दिष्टही अर्ध्यावरप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ६७१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ १ हजार ८०६ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला या योजनेअंतर्गत दिलेले उद्दिष्टही अर्ध्यावरच दिसून येते. यामध्ये गंगाखेड तालुक्याला ३४० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३० घरकुले पूर्णत्वास गेले आहेत. जिंतूर तालुका ५६१ पैकी ३५९, मानवत १४६ पैकी १११, पालम ३५८ पैकी २५८, परभणी ४०५ पैकी २५४, पाथरी २२४ पैकी १८२, पूर्णा २४१ पैकी १४०, सेलू २१३ पैकी १६७, सोनपेठ १८३ पैकी १०५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा अडथळाप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे करताना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. परभणी पंचायत समिती प्रशासनामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन छाननी, मंजूर व प्रशासकीय मान्यता देणे आदी कामे केली जातात. मात्र घरकुलांचे जिओ टॅगिंग करण्यासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी कंपनीने गृहनिर्माण अभियंता या पदाचे कंत्राटी पद्धतीने दोन पदे भरली आहेत. या अभियंत्यांनी जिओ टॅगिंग करुन पं.स. प्रशासनाला अहवाल सादर करावयाचा असतो. त्यानंतर लाभार्थ्याला घरकुलाची रक्कम अदा केली जाते. मात्र घरकुल लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व घरकुलांचे अंतिमीकरण याची प्रगती परभणी तालुक्यात असमाधानकारक आहे.यावरुन परभणी पंचायत समितीच्या वतीने तीन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस १७ एप्रिल रोजी पाठविण्यात आली आहे. मात्र अजूनही या अभियंत्याचे काम समाधानकारक झाले नाही. त्यामुळे या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदाचाच या योजनेला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर वचक ठेवून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरpanchayat samitiपंचायत समिती