शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परभणी:बाह्य वळण रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:13 IST

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्याने कामे ठप्प पडली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठीपरभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्याने कामे ठप्प पडली आहेत़कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम परभणी जिल्ह्याच्या हद्दीत गतीने सुरू असले तरी शहर परिसरात मात्र या कामाला अनेक अडथळे येत आहेत़ शहरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहतुकीचा येणारा ताण लक्षात घेऊन परभणी शहराबाहेरून १४़५ किमी अंतराचा बाह्य वळण रस्ता मंजूर करण्यात आला़ त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एजन्सी नियुक्त करून या रस्त्याची मोजणी, आवश्यक असलेल्या जमिनीची नोंद घेतली़ महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे गट क्रमांक, शेतकऱ्यांच्या नावांसह यादी राजपत्रात प्रकाशित झाली़त्यामुळे या मार्गाचे काम आता वेगाने होईल, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा हे काम ठप्प पडले आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संपादित करावयाच्या जमिनीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्या पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावरील भूसंपादन विभागाने पूर्ण केली़ या मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले़ शेतकºयांच्या सुनावण्या घेण्यात आल्या़ त्यानंतर ज्या शेतकºयांची ही जमीन आहे, त्यांना शासनाकडून मावेजा देण्यासाठी लागणाºया रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली़१४़५ किमी अंतराच्या या रस्त्यासाठी ६१ कोटी ९६ लाख ८८ हजार २५१ रुपये एवढा निधी आवश्यक आहे़ या निधीचा प्रस्ताव येथील भूसंपादन विभागाने फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे पाठविला आहे़ मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया ठप्प पडली आहे़ एकीकडे मानवत तालुक्यापर्यंत या रस्त्याचे काम वेगाने होत आहे़ परभणी शहराच्या पुढे झिरोफाटा ते वसमत, नांदेडपर्यंत या कामाने गती घेतली असताना परभणी शहराबाहेरून काढण्यात आलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम मात्र ठप्प आहे़सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीत मागणी केलेला हा निधी उपलब्ध होईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे निधीसाठी किमान दोन महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पाच गावांतील शेतकºयांच्या जमिनीपाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयापासून ते वसमत रस्त्यावरील असोला पाटीपर्यंत १४़५ किमी अंतराचा हा बाह्य वळण रस्ता तयार केला जाणार आहे़ या रस्त्यासाठी परभणी, धर्मापुरी, पारवा, वांगी आणि असोला या पाच गावांच्या शिवारातील जमीन संपादित करावी लागणार आहे़ पारवा शिवारामधील १़७६ हेक्टर, धर्मापुरी शिवारातील १०़७४ हेक्टर, परभणी शिवारातील ४२़१५ हेक्टर, वांगी शिवारातील १५़८९ हेक्टर आणि असोला शिवारातील १३़९१ हेक्टर अशी ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अडकली आहे़ जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल़ त्यामुळे बाह्य वळण रस्त्यासाठी जमीन संपादन हा मुख्य भाग असून, प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़आचारसंहितेचा अडसर नाही४जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये या जमीन संपादनासाठी ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे़ रस्त्याचे काम सुरू आहे़ त्याचा प्रस्तावही आचारसंहितेपूर्वीच पाठविण्यात आला आहे़ शेतकºयांचे जे पैसे देणे आहेत, ते द्यावेच लागतील़ हा निधी वितरित करण्यात कुठलीही अडचण येणार नाही़ जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला असून, निधीची प्रतीक्षा आहे़ हा निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकNational Highwayराष्ट्रीय महामार्ग