शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:56 IST

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण होत आहेत. कसुरा व करपरा नदी काठावरील गावांना नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही गावातील जलकुंभ कोरडे पडल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील लाडनांद्रा, गव्हा, ढेंगळी पिंपळगाव, पार्डी कौसडी, तांदुळवाडी, शिंदे टाकळी, चिकलठाणा बु., गुळखंड, खादगाव, कन्हेरवाडी, कान्हड, जवळा जिवाजी, कुंडी, वाकी, झोडगाव या १५ ग्रामपंचायतींनी गावातील पाणी उपलब्ध असलेले २२ जलस्रोत अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. यामधील १७ प्रस्ताव मंजूरीसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. पं.स.कडून अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आल्यानंतर मंडळ अधिकाºयांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करून मंजूरी दिली जाते. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने अनेक दिवस अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित विभागात मंजुरीअभावी पडून आहेत.कसुरा, करपरा : नदीकाठ तहानलेलाच४ कसुरा, करपरा नदीवर मोठा बंधारा नाही. त्यामुळे पाणी अडविण्याचे साधन नाही. पावसाचे पाणी नदीपात्रातून सरळ वाहून जात आहे.४परिणामी दोन्ही नदी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई