शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:56 IST

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण होत आहेत. कसुरा व करपरा नदी काठावरील गावांना नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही गावातील जलकुंभ कोरडे पडल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील लाडनांद्रा, गव्हा, ढेंगळी पिंपळगाव, पार्डी कौसडी, तांदुळवाडी, शिंदे टाकळी, चिकलठाणा बु., गुळखंड, खादगाव, कन्हेरवाडी, कान्हड, जवळा जिवाजी, कुंडी, वाकी, झोडगाव या १५ ग्रामपंचायतींनी गावातील पाणी उपलब्ध असलेले २२ जलस्रोत अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. यामधील १७ प्रस्ताव मंजूरीसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. पं.स.कडून अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आल्यानंतर मंडळ अधिकाºयांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करून मंजूरी दिली जाते. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने अनेक दिवस अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित विभागात मंजुरीअभावी पडून आहेत.कसुरा, करपरा : नदीकाठ तहानलेलाच४ कसुरा, करपरा नदीवर मोठा बंधारा नाही. त्यामुळे पाणी अडविण्याचे साधन नाही. पावसाचे पाणी नदीपात्रातून सरळ वाहून जात आहे.४परिणामी दोन्ही नदी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई