शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत झाली केवळ ३५०० तूर उत्पादक शेतकर्‍यांची आधारभूत खरेदी योजनेत नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:19 IST

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागला होता. एक-एक महिना केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लावून उभे रहावे लागले. ही परिस्थिती यावर्षी उद्भवू नये म्हणून राज्य शासनाने ज्या तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव दराने खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे, त्या शेतकर्‍यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नोंदणी केल्यानंतरच त्या शेतकर्‍यांची तूर हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांनी शेतकर्‍यांना धोका दिला आहे.

शेतकर्‍यांच्या आशा तुरीवर आहेत. खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यामध्ये झालेल्या समाधानकारक परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे तूर पीक चांगले जोमात आले होते. त्यातून चांगले उत्पादनही शेतकर्‍यांना होत आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या तुरीचा प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांना आपली तूर नाफेडच्या हमीभाव केंद्रावर विक्री करावयाची  आहे, त्या शेतकर्‍यांनी सर्वप्रथम आपापल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आॅनलाईनच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, जिंतूर, परभणी, गंगाखेड, पालम, सोनपेठ या नऊ तालुक्यातील जवळपास साडे तीन हजार शेतकर्‍यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. 

आॅनलाईनचा अडथळाराज्य शासनाच्या नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीमध्ये शेतकर्‍यांकडे असलेला तुरीचा पेरा, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक, होर्डिग्ज प्रमाणपत्र, पीक पेरा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे सादर करावयाची आहेत. याची माहिती आॅनलाईन प्रणालीत नोंद करावयाची आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने तूर उत्पादकांसह अधिकारी, कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.  

हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरु कराजिल्ह्यातील बाजारपेठेत नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांपेक्षा जवळपास १ हजार रुपये कमी दराने शेतकर्‍यांना खाजगी बाजारपेठेत तुरीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.