शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कांदा उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:03 IST

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती तसेच कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनाच २०० रुपये प्रति क्विंटल दराने अनुदान दिले जाणार आहे. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते; परंतु, जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला जात नाही. खुल्या बाजारपेठेत हे शेतकरी कांद्याची विक्री करतात. या शेतकºयांनाही यावर्षीच्या दुष्काळाचा फटका बसला आहे. तसेच कांद्याला कमी भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनाही नुकसान सहन करावे लागले. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार केवळ बाजार समितीतच कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अनुदानाचा लाभ मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. तेव्हा शासनाने बाजार समितीत कांदा विक्री केल्याची अट रद्द करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदा