शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

परभणी : जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:22 IST

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांदेडमध्ये भेट घेतली. दुसरीकडे विरोधक असलेल्या भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत निर्णय झाला नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांदेडमध्ये भेट घेतली. दुसरीकडे विरोधक असलेल्या भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत निर्णय झाला नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.बाबाजानी दुर्राणी यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार आहे. तत्पूर्वी रिक्त होणाऱ्या या जागेसाठी येत्या १० ते १५ दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध हालचाली करत व्यूहरचना आखली जात आहे. त्या दृष्टीकोनातून आ.दुर्राणी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सदस्यांसह इतर सदस्यांशीही संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. राज्यस्तरावरील धोरणात्मक निर्णयानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी हे स्थानिक स्वराज्य संस्था गटातील निवडणुका आघाडीकरुनच लढणार असल्यामुळे परभणीची जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहणार असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसची पुरेपुर साथ मिळावी, या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण व आ.बाबाजानी दुर्राणी यांची भेट झाली. या भेटीत या निवडणुकी संदर्भात ओझरती चर्चा झाली. त्यानंतर ८ एप्रिल रोजी आ.दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदारांनी नांदेड येथे खा. चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. लवकरच या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याने आ.दुर्राणी यांनी मतदारांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली आहे. शिवाय परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ५०२ मतदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे १६२ आणि काँग्रेसचे १३५ असे २९७ चे संख्याबळ आहे. शिवाय इतरही काही मतदार त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. शिवसेना वगळता राष्टÑवादीचे संख्याबळ ३४० पर्यंत जाईल, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.या पार्श्वभूमीवर भाजपाकडे असलेल्या या जागेवर दुर्राणी यांच्या विरोधात भाजपाकडून कोण उमेदवार असणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परभणी जिल्ह्यात भाजपाचे २० व हिंगोली जिल्ह्यात ३१ असे एकूण ५१ मतदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपाची फारसी ताकद नसली तरी दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेचे एकूण ९७ मतदार भाजपला मदत करतात की नाही, हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भाजपा- शिवसेनेच्या युती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यस्तरावर शिवसेना-भाजपामध्ये वाढलेली मतभेदाची दरी ही भाजपा उमेदवारासाठी चिंतेचा विषय असणार आहे. शिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार आ.दुर्राणी यांना तगडा स्पर्धक म्हणून भाजपाकडून कोण राहणार, हे ही निश्चित होत नाही. सद्यस्थितीत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातून भाजपाकडून पाच ते सहा जणांची नावे चर्चेत आहेत. विशेषत: इतर पक्षातून भाजपात काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्यांकडून उमेदवारी मागितली जात असल्याची चर्चा आहे. असे असेल तर मग अनेक वर्षापासून निष्ठेने भाजपाचे काम करणाºया कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.परभणी- हिंगोली आणि लातूर- उस्मानाबाद- बीड या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.त्या दृष्टीकोनातून रविवारी परभणीतील राष्ट्रवादीच्या आमदारांशी नांदेडमध्ये चर्चा केली आहे. समोपचाराने या संदर्भात योग्य तो घेतला जाईल.- खा.अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकHingoliहिंगोलीAshok Chavanअशोक चव्हाण