शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

परभणी : वर्षभरातच राष्टÑीय महामार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:37 IST

राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कल्याण ते निर्मल राष्टÑीय महामार्ग २२२ हा पाथर्डी मार्गे बीड जिल्ह्यातील गढी, माजलगाव, पाथरी व परभणी असा जातो. पाथरी तालुक्यातील ढालेगावपासून सुरू होणाऱ्या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र ढालेगाव येथील गोदावरी पात्रात असलेल्या पुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूने भराव भरण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ढालेगाव ते पाथरी ८ कि.मी.चे अंतर असून राष्टÑीय महामार्गावर ढालेगावच्या नजीक वर्षभरातच रस्त्याची वाट लागली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्याचबरोबर ढालेगाव नजीक रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आलेल्या नाल्यामुळे गतवर्षी या भागात पावसाचे पाणी साचून बाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.नाल्यातील पाण्याला उतार नसल्याने हा रस्ता खचला गेला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे पाच वर्ष असली तरी खचलेल्या रस्त्यावर अद्यापही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. खचलेल्या रस्त्यामुळे या भागात वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.ठेकेदार झाले गायब४राष्टÑीय महामार्गावर ढालेगाव ते मानवत रोड रेल्वेस्टेशनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मानवतरोड ते परभणीपर्यंत जाणाºया रस्त्यावर हैदराबाद येथील नवीन एजन्सीला काम देण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी भराव भरण्यात आला.४गेल्या दोन महिन्यापासून तर या रस्त्यावरील काम पूर्णत: बंद करून ठेकेदार गायब झाला आहे. पर्यायाने पाथरीपासून मानवतरोडपर्यंत १८ कि.मी. अंतरापर्यंत रस्ता पूर्ण झाला. मात्र पुढील २५ कि.मी. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरून रहदारी करणे जिकीरीचे बनले आहे.४दरम्यान, राष्टÑीय महामार्ग असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम झाल्यानंतर वर्षभरातच हा रस्ता दबला गेला आहे. या रस्त्याचे काम होत असताना संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग