शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पुण्यातील व्यक्तीची धारधार शस्त्राने हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:40 IST

पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारधार शस्त्राने खून केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा यानिमित्ताने पोलिसांनी कसून तपास करुन उलगडा केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारधार शस्त्राने खून केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा यानिमित्ताने पोलिसांनी कसून तपास करुन उलगडा केला आहे.मानवत तालुक्यातील इटाळी शिवारातील कॅनॉलमध्ये २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका ५५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मयत व्यक्तीच्या शरीरावर घाव आढळून आल्याने घातपातचा पोलिसांना संशय होता. विशेष म्हणजे सदरील व्यक्तीचा साधारणत: पाच दिवसांपूर्वी खून झाला असावा, असे चित्र पोलिसांना घटनास्थळावरील स्थितीवरून पहावयास मिळाले. कॅनॉलच्या जवळच रक्त पडल्याचे आढळून आल्याने संबंधित व्यक्तीचा खूनच झाल्याची पोलिसांना खात्री झाली. मयताच्या हातामध्ये ब्रासलेट व खिशात बुलेटची चावी आढळून आली होती. या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी घटनास्थळाचा बारीक तपास केला. त्यानंतर या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी मानवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर मानवत पोलिसांनी राज्यातील विविध व्यक्तींची माहिती घेणे सुरु केले. त्यातच पुणे शहरातील चर्तुश्रृंगी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झालेल्या व्यक्तीच्या शोधात त्याचे काही नातेवाईक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मानवत पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना मयत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या वस्तू व फोटो पोलिसांनी दाखविल्या. त्यावेळी त्यांनी सदरील व्यक्ती पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील रोहिदास दशरथ बालवडकर (५५) असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस नायक मुंजाभाऊ पायघन, पोकॉ.समीर पठाण, बालकिशन मगर व स्थानिक गुन्हे शाखेचे निलेश भूजबळ, सुग्रीव केंद्रे यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांनी पुणे येथील चर्तुश्रृंगी पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलीस कर्मचाºयांना घेऊन खुनाचा तपास सुरु केला. अवघ्या काही तासातच या खुनातील प्रमुख आरोपी विठ्ठल ज्ञानोबा काळे (रा.थार ता.मानवत, ह.मु.बालेवाडी), नारायण धोंडीबा राठोड (रा.सारंगपूर ता.मानवत) या दोघांना पुणे येथून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांच्या एका पथकाने अटक केली.या दोन्ही आरोपींना पोलिसांचे पथक मानवत येथे घेऊन येत आहे. तर तिसरा आरोपी महादेव चिंतामणी (रा.सारंगपूर ता.मानवत) याला पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी पूर्णा येथून दुपारी ४ वाजेच्या सुमारास अटक केली.असा केला बालवडकर यांचा खून४पोलिसांनी अटक केलेला या प्रकरणातील प्रमुख आरोपी विठ्ठल ज्ञानोबा काळे हा कुटुंबियांसह पुणे शहरातील बालेवाडी परिसरात राहतो. मयत रोहिदास बालवडकर हा देखील बालेवाडी परिसरातच राहत होता. आरोपी विठ्ठल काळे हा १८ फेब्रुवारी रोजी पत्नी व मुलांसह मानवत तालुक्यातील थार या मूळ गावी आला होता. त्यानंतर मयत रोहिदास बालवडकर हा देखील मानवत तालुक्यात बालेवाडीतून आला. त्यानंतर त्याने विठ्ठल काळे याच्याशी संपर्क केला. त्यानंतर विठ्ठल काळे, नारायण राठोड व महादेव चिंतामणी या तिघांनी २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री रोहिदास बालवडकर याचा धारधार शस्त्राने खून केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुनाचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले तरी या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनCrime Newsगुन्हेगारी