शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

परभणी महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:16 IST

दोन महिन्यांपासून येथील महानगरपालिकेचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ विकासाची कामे तर सोडाच; परंतु, नियमित स्वच्छतेची कामेही होत नसल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांपासून येथील महानगरपालिकेचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ विकासाची कामे तर सोडाच; परंतु, नियमित स्वच्छतेची कामेही होत नसल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची एप्रिल महिन्यात बदली झाली़ त्यानंतर परभणी महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले नाहीत़ सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपाच्या आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविलेला आहे़ तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले होते़ कर्मचाºयांना शिस्त लावली होती़ कामांचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना कामांची जबाबदारी निश्चित करून दिली होती़ त्यामुळे शहरात नियमित स्वच्छतेची कामे झाली़ मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छ असलेले शहर ५ -६ महिन्यांपूर्वी स्वच्छतेच्या वाटेवर येत असल्याचे दिसू लागले़ शहरवासियांसाठी ही समाधानाची बाब ठरली; परंतु, हा बदल अल्पकाळाचा ठरला आहे़ आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर महानगरपालिकेतील संपूर्ण कारभार ढेपाळला आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांवर नियंत्रण राहिले नसून, शहरातील स्वच्छतेची कामे ही ठप्प पडली आहेत़दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता केली जाते़ या स्वच्छतेमुळे पावसाळ्यात जमा होणारे पाणी शहराबाहेर काढून देणे सोयीचे होते़ यावर्षी पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेलाच फाटा देण्यात आला़ ओरड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वच्छतेचे टेंडर काढण्यात आले़ जेसीबी मशीनच्या सहाय्याने एक-दोन नाल्यांची जुजबी स्वच्छताही करण्यात आली; परंतु, प्रमुख मोठे नाले आणि वसाहतींमधील नाल्यांची स्वच्छता झालीच नाही़ डिग्गी नालाही पूर्वी प्रमाणेच गाळाने भरलेला आहे़ त्यामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़ शहरात जागोजागी पाण्याचे डबके साचले असून, नाल्यांमधील कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे़ स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट काढले; परंतु, स्वच्छता झाली नाही़ त्यामुळे या कामांतून काय साध्य झाले, असा प्रश्न निर्माण होत आहे़ शहराच्या स्वच्छता आणि विकासाच्या कामांबरोबरच महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाजही विस्कळीत झाले आहे़ नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून, विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक महापालिकेच्या कार्यालयात चकरा मारतात; परंतु, अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याने या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे़ अधिकारीच कार्यालयीन वेळेत त्यांच्या कक्षात थांबत नसल्याने कर्मचारीही उपलब्ध होत नाहीत़ नागरिकांची कामे खोळंबून गेली आहेत़ त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे़ कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचेच दिसत आहे़विरोधी पक्षही चिडीचूपशहरातील विकास कामांबरोबरच प्रशासकीय कामात विस्कळीतपणा आला असताना याविरूद्ध जाब विचारण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत़ शहरात स्वच्छतेची कामे होत नाहीत़ १० ते १५ दिवसांपर्यंत शहरवासियांना पाणी मिळत नाही़ अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील सदस्यांनी आवाज उठविणे अपेक्षित असताना विरोधी नगरसेवकही चिडीचूप असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़जिल्हाधिकाºयांचे झाले दुर्लक्षमहानगरपालिकेचा पदभार जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे आल्यानंतर महापालिकेतील कारभारात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कोल्हापूर येथे मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळल्याने या अनुभवाचा परभणी महापालिकेलाही फायदा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, प्रभारी पदाच्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात एकही ठोस धोरणात्मक निर्णय झाला नाही़ तसेच अधिकारी, कर्मचाºयांवरही जिल्हाधिकाºयांचे नियंत्रण राहिलेले नाही़दोन महिन्यांपूर्वी असलेली प्रशासकीय शिस्त आणि प्रशासकीय घडी सध्या पूर्णत: विस्कळीत झाली आहे़ जिल्हाधिकाºयांनीच याकडे लक्ष देऊन प्रशासकीय कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे़घंटागाड्या बंद पडल्याशहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका निभावणाºया घंटागाड्या सध्या बंद आहेत़ महापालिकेने कमी किंमतीचे कंत्राट मंजूर केल्याने घंटागाडी चालकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नवीन कंत्राटामुळे या चालकांना पूर्वीपेक्षा कमी पगारावर काम करावे लागणार आहे़ त्यामुळे घंटागाडी चालकांमध्ये नाराजी असून, मागील १५ दिवसांपासून शहरातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत़ परिणामी वसाहतींमधील कचरा वाढत चालला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न