शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका :शहरातील कचरा विघटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:09 IST

शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़परभणी शहरात जमा होणारा कचरा सद्यस्थितीला धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकला जातो़ मागील काही वर्षांपासून याच ठिकाणी कचºयाची साठवणूक केली जाते़ धार रोड भागात नागरी वसाहती वाढत असून, या ठिकाणच्या कचºयाचा प्रकल्प शहरापासून दूर अंतरावर नेणे गरजेचे झाले होते़ धार रोड परिसरातील डम्पींग ग्राऊंड बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती़ या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरापासून साधारणत: ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात सहा एकर जमिनीवर कचºयाचा विघटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला़ या ठिकाणी कचरा विघटन प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते़ काही दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़परभणी शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी कचºयापासून खत, बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. शहरात निर्माण होणारा दररोजचा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे, या कचºयाचा पुनर्वापर करणे या कामांना प्राधान्य देत प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या नाहरक परवानग्यांमुळे सध्या या ठिकाणी काम सुरू झाले नव्हते. मात्र प्रदुषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याने आता प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.येत्या काही महिन्यांमध्येच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून, परभणी शहरात जमा होणाºया कचºयाचे योग्य विघटन होवून मनपाला आर्थिक उत्पन्नही प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे़१०० टन कचºयाचे शहरात संकलन४परभणी शहरातील कचºयाचे संकलन करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या असून, या घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज १०० टन कचरा संकलित केला जात आहे़४सध्या हा कचरा धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकण्यात येत असून, त्यापैकी ३५ टक्के कचरा विलगीकरण करून प्राप्त होतो़ शहरातील घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ६९ जुन्या घंटागाड्यांसह नवीन १२ घंटागाड्यांची त्यात भर पडली आहे़४या घंटागाड्यांना स्वतंत्र मार्ग आखून देण्यात आले आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत घंटागाड्या नियमितपणे फिरत असलयाचे दिसत आहे़बायोगॅस प्रकल्पाची : होणार उभारणी४बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पाच्या ठिकाणी कचºयातून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे़ यासाठी ५ टनाचे दोन प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत़ तसेच मेकॅनिकल कम्पोस्टींग खत तयार करण्याचाही प्रस्ताव आहे़ बोरवंड परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला शहरातूनच कचरा विघटन करून नेणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा संकलन करतानाच तो वर्गीकरण करुनच संकलन करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.सद्यस्थितीत कचºयाचे विघटन होत नसले तरी लवकरच या अनुषंगाने जनजागृती करून बोरवंड येथे ओला, सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा, प्लास्टिक वेगवेगळ्या पद्धतीने साठविले जाणार आहे़बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्प हा पर्यावरणपूरक असावा, यावर भर आहे़ त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाला थिक फॉरेस्ट (झाडांचा वेढा) असलेले संरक्षक कुंपन नैसर्गिकरित्या तयार केले जाणार आहे़ जेणे करून या प्रकल्पामधील कचºयाची दुर्गंधी प्रकल्पाबाहेर येणार नाही, यासाठी प्रयत्न आहेत़ येत्या सहा ते सात महिन्यांत प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करू़-रमेश पवार, आयुक्त, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न