शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय

By मारोती जुंबडे | Updated: February 27, 2024 15:45 IST

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

परभणी: शहर महानगरपालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे शंभर टक्के सहाय्यक अनुदान देण्यात यावे, यासह इतर सात प्रमुख मागण्यासाठी कर्मचारी २७ फेब्रुवारीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरातील तीनही प्रभाग समित्या कुलूपबंद दिसून आल्या. दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काम बंद धरणे सुरू करण्यात आले आहे.

शहर महानगरपालिकेचे घरपट्टी व नळपट्टी यांची वसुली कमी आहे. वसुली करता राजकीय मोठा हस्तक्षेप होत आहे. मालमत्ता करही अपेक्षित मिळत नसल्याने कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मनपाला दरमहा दोन कोटी रुपयांची तरतूद करावी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहत आहे. त्याचबरोबर मुंबई येथील आझाद मैदानावर वेगवेगळ्या मागण्यासाठी १६ नोव्हेंबर २०२३ पासून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

परंतु, अद्याप पर्यंत त्यावर उपाययोजना झालेल्या नाहीत. कर्मचारी व सेवानिवृत्त आर्थिक तंगीत सापडले आहेत. त्यामुळे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे शंभर टक्के सहाय्यक अनुदान देण्यात यावे, वाढीव जीएसटी अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, चार ते पाच महिन्याचे थकीत वेतन अदा करावे, सातव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचे आदेश देण्यात यावेत, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदावर प्रभारी म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना प्रथम त्या पदावर समावेश करण्यात यावे, यासह आदी मागण्यासाठी परभणी शहर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये नासेर खान, विनय ठाकूर, विशाल उपाडे, विश्वनाथ गोवाडे, रामभाऊ कामखेडे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोयपरभणी शहर महानगरपालिका अधिकारी- कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला आहे. परिणामी,मंगळवारी तिन्ही प्रभाग समिती, जन्ममृत्यू व विवाह नोंदणी कार्यालय बंद होते. प्रभाग समितीसह जन्म व मृत्यूचे प्रमाणपत्र त्याचबरोबर विवाह नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय पहावयास मिळाली. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMuncipal Corporationनगर पालिका