शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:29 AM

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त खा़ सुप्रिया सुळे १० सप्टेंबर रोजी येथे आल्या होत्या़ यानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़ यावेळी खा़ सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली़ शेतकरी कर्जमाफी व शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत सरकारला देणे-घेणे नाही़ शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे़ संपूर्ण देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडली असून, व्यापार ठप्प झाला आहे़ हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली, शेतकºयांची कर्जमाफी नाही़ अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे़ या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार असून, या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या़ विजय भांबळे यांच्यासारखे आमदार तुम्हाला मिळाले आहेत़ त्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे़ त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा कायापालट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ कार्यक्रमास शिवचरित्र व्याख्याते प्रा़ यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सारंगधर महाराज, जि़प़ सदस्या शालिनीताई राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत, अरुणा काळे, संगीता घोगरे, नमिता बुधवंत, ममता मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे, सभापती इंदुमती भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़५०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला- विजय भांबळे४आ़ विजय भांबळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघ कधीही सोडला नाही़ सातत्याने दौरे केले़ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समजू लागले़ हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला़ त्यातूनच विविध योजनांच्या माध्यमातून जिंतूर मतदारसंघासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला़४तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य आदी प्रश्न सोडविण्यासाठी कधीही कमी पडला नाही़ जनतेच्या कामांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे २४ तास उघडे असतात, असे सांगून जिंतूर तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरतात़ त्यानंतर पाच वर्षे गायब होतात, असा आरोप आ़ भांबळे यांनी केला़

टॅग्स :parabhaniपरभणीSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी