शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:31 IST

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त खा़ सुप्रिया सुळे १० सप्टेंबर रोजी येथे आल्या होत्या़ यानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़ यावेळी खा़ सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली़ शेतकरी कर्जमाफी व शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत सरकारला देणे-घेणे नाही़ शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे़ संपूर्ण देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडली असून, व्यापार ठप्प झाला आहे़ हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली, शेतकºयांची कर्जमाफी नाही़ अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे़ या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार असून, या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या़ विजय भांबळे यांच्यासारखे आमदार तुम्हाला मिळाले आहेत़ त्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे़ त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा कायापालट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ कार्यक्रमास शिवचरित्र व्याख्याते प्रा़ यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सारंगधर महाराज, जि़प़ सदस्या शालिनीताई राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत, अरुणा काळे, संगीता घोगरे, नमिता बुधवंत, ममता मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे, सभापती इंदुमती भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़५०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला- विजय भांबळे४आ़ विजय भांबळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघ कधीही सोडला नाही़ सातत्याने दौरे केले़ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समजू लागले़ हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला़ त्यातूनच विविध योजनांच्या माध्यमातून जिंतूर मतदारसंघासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला़४तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य आदी प्रश्न सोडविण्यासाठी कधीही कमी पडला नाही़ जनतेच्या कामांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे २४ तास उघडे असतात, असे सांगून जिंतूर तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरतात़ त्यानंतर पाच वर्षे गायब होतात, असा आरोप आ़ भांबळे यांनी केला़

टॅग्स :parabhaniपरभणीSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी