शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:31 IST

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त खा़ सुप्रिया सुळे १० सप्टेंबर रोजी येथे आल्या होत्या़ यानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़ यावेळी खा़ सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली़ शेतकरी कर्जमाफी व शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत सरकारला देणे-घेणे नाही़ शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे़ संपूर्ण देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडली असून, व्यापार ठप्प झाला आहे़ हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली, शेतकºयांची कर्जमाफी नाही़ अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे़ या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार असून, या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या़ विजय भांबळे यांच्यासारखे आमदार तुम्हाला मिळाले आहेत़ त्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे़ त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा कायापालट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ कार्यक्रमास शिवचरित्र व्याख्याते प्रा़ यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सारंगधर महाराज, जि़प़ सदस्या शालिनीताई राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत, अरुणा काळे, संगीता घोगरे, नमिता बुधवंत, ममता मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे, सभापती इंदुमती भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़५०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला- विजय भांबळे४आ़ विजय भांबळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघ कधीही सोडला नाही़ सातत्याने दौरे केले़ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समजू लागले़ हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला़ त्यातूनच विविध योजनांच्या माध्यमातून जिंतूर मतदारसंघासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला़४तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य आदी प्रश्न सोडविण्यासाठी कधीही कमी पडला नाही़ जनतेच्या कामांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे २४ तास उघडे असतात, असे सांगून जिंतूर तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरतात़ त्यानंतर पाच वर्षे गायब होतात, असा आरोप आ़ भांबळे यांनी केला़

टॅग्स :parabhaniपरभणीSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी