शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २० कोटींच्या परताव्यावरुन मनपा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:07 IST

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेतील निधीतून जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यात आले नाही; परंतु, अमृत योजनेत जलशुद्धीकरण केंद्र मंजूर झाल्याने यासाठी पूर्वी दिलेला २० कोटी रुपयांचा निधी शासनाने व्याजासह परत मागितल्याने महानगरपालिकेची गोची झाली आहे. हा निधी परत करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची तयारी मनपाने चालविली असली तरी बँका कोणत्या आधारावर मनपाला एवढ्या मोठ्या कर्जाची रक्कम देतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या युआयडीएसएसएमटी योजनेतील निधीतून जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यात आले नाही; परंतु, अमृत योजनेत जलशुद्धीकरण केंद्र मंजूर झाल्याने यासाठी पूर्वी दिलेला २० कोटी रुपयांचा निधी शासनाने व्याजासह परत मागितल्याने महानगरपालिकेची गोची झाली आहे. हा निधी परत करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची तयारी मनपाने चालविली असली तरी बँका कोणत्या आधारावर मनपाला एवढ्या मोठ्या कर्जाची रक्कम देतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र शासनाची युआयडीएसएसएमटी योजना मंजूर झाली होती. या अंतर्गत तब्बल १३० कोटी रुपये खर्च करुनही शहराला योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळालेले नाही. अशातच ही योजना आत बंद झाली असून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत अभियानांतर्गत जवळपास १०२ कोटी ९४ लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. असे असले तरी युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत शहरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शासनाने जवळपास २० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला दिला होता; परंतु, मनपाने या योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या जवळपास २० कोटी रुपयांचे अधिकचे काम केले. वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत त्याला मनपाने मंजुरी दिली असली तरी शासनाकडून निधी मात्र उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राचे २० कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले. आता शासनाने मंजूर केलेल्या अमृत अभियानात जलशुद्धीकरण केंद्राचे काम मंजूर आहे. त्यामुळे पूर्वीच्या न केलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची जवळपास २० कोटी रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश ८ फेब्रुवारी २०१७ रोजी राज्य शासनाने अमृत अभियानाच्या अनुषंगाने काढलेल्या आदेशात मनपाला दिले होते. जवळपास एक वर्षाचा कालावधी यासाठी उलटला; परंतु, ही २० कोटी रुपयांची रक्कम शासनाला परत करण्यात मनपाला यश आलेले नाही. मुळातच महानगरपालिकेची आर्थिक अवस्था वाईट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाºयांचा पगार होत नाही. अशात अमृत योजनेचाच जवळपास २५ कोटी रुपयांचा लोकवाटा मनपाला भरायचा असताना आता युआयडी एसएसएमटीची २० कोटी रुपयांची थकबाकी कोठून भरायची, असा प्रश्न मनपाला पडला आहे. ४ डिसेंबर रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, मनपा अगोदरच आर्थिक संकटात असल्याने बँका कोणत्या आधारावर मनपाला २० कोटी रुपयांचे कर्ज देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जासाठी मनपाला मालमत्ता गहाण ठेवावी लागणार आहे. त्यासाठी कोणत्या मालमत्तेची मनपा निवड करेल व ती मालमत्ता बँका ग्राह्य धरतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.मालमत्ता करवाढीतून पैसे उभारण्याचा खटाटोपकर वसुली समाधानकारक नसल्याने अमृतच्या लोकवाट्याची रक्कम उभारण्यासाठी मनपाने सर्वसाधारण सभेत मालमत्ता करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसाधारणपणे २५ टक्के होणारी करवाढ लोकवाट्यासाठी ४० टक्के करण्याचा प्रस्ताव खुद्द मनपा आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत मांडला होता. त्याला सदस्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे ४० टक्केची करवाढ त्यावेळी रद्द करण्यात आली. परंतु, अनिवासी व्यावसायिकांचा कर मात्र दुप्पट करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. आता पुन्हा शहराच्या मालमत्ता करवाढीच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून मनपाकडून सुरू करण्यात आल्या. परंतुु, ही संभाव्य करवाढ अव्वाच्या सव्वा असल्याने नागरिकांनी त्याबाबत अनेक आक्षेप नोंदविले आहेत. परिणामी तुर्तास ही करवाढ थंड बस्त्यात आहे.युआयडीएसएसएमटीची एफडीही केली परतयुआयडीएसएसएमटी या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे राज्य शासनाच्या संतोषकुमार समितीने केलेल्या पाहणीनंतर राज्य शासनाला २९ एप्रिल २०१७ रोजी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. त्या अनषुंगाने दोषींवर राज्य शासनाकडून कारवाई होणे आवश्यक होते. परंतु, तसे काहीही झाले नाही. या पार्श्वभूमीवर या योजनेचे काम करणाºया कंत्राटदाराला मनपाने सर्व बिलांची अदाई केली आहे. एवढेच नव्हे तर सदरील कंत्राटदाराने मनपाकडे निविदा घेते वेळी ठेवलेली १ कोटी ८ लाख ६० हजार ६६४ रुपयांची एफडी स्वरुपातील रक्कम मोठ्या उदार मनाने मनपाच्या अधिकाºयांनी कंत्राटदाराला परत केली आहे.