शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परभणी : कौसडी गावातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:59 IST

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे कठीण झाले आहे.जिंतूर तालुक्यातील कौसडी हे गाव मोठे असून गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारावर आहे. गावात अनेक अंतर्गत रस्ते असून या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गावातील जीवने गल्ली, बहिरट गल्ली, प्रबोध नगर या भागात ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे.ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून गावातला विविध विकास करण्यासाठी लाखो रुपये निधी मंजूर असून सुद्धा ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कामासाठी या निधीचा वापर न केल्यास दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांना समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज गूल होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहे, अशा परिस्थितीत कौसडीवासियांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे.आरोग्याचा धोका४रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नाल्या तुंबल्यामुळे सर्वत्र पाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.४वेळोवेळी ग्रामपंचायतीला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे लक्ष देऊन गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस