शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:39 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरील खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. असे असताना संकटातील शेतकºयांना दिलासा देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात दौरा करुन शेतकºयांना दिलासा दिला; परंतु, शिवसेनेचेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र जिल्ह्याकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी वगळता सातही जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. एकमेव परभणी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी केलेली नाही. त्यामुळे असे पालकमंत्री काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तरी निवडणुकीपर्यंत जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांचा जिल्ह्यात राबता होता. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपर्कमंत्री लोणीकर हे गायब झाले. त्यांनी त्यांच्या जालना जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली; परंतु, संपर्कमंत्री म्हणून परभणीचा दौरा करण्याची तसदी त्यांना घ्याविशी वाटली नाही. विशेष म्हणजे दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यासाठी विरोध करुन आंदोलन करणारे लोणीकर हेच होते. त्यावेळी लोणीकर यांच्या भूमिकेविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आताही शेतकरी संकटात असताना लोणीकर हे गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेतेही दूरच४जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहेत. राज्यस्तरावरील केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली आहे. भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मात्र यापासून दूरच आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस