शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:39 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरील खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. असे असताना संकटातील शेतकºयांना दिलासा देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात दौरा करुन शेतकºयांना दिलासा दिला; परंतु, शिवसेनेचेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र जिल्ह्याकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी वगळता सातही जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. एकमेव परभणी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी केलेली नाही. त्यामुळे असे पालकमंत्री काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तरी निवडणुकीपर्यंत जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांचा जिल्ह्यात राबता होता. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपर्कमंत्री लोणीकर हे गायब झाले. त्यांनी त्यांच्या जालना जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली; परंतु, संपर्कमंत्री म्हणून परभणीचा दौरा करण्याची तसदी त्यांना घ्याविशी वाटली नाही. विशेष म्हणजे दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यासाठी विरोध करुन आंदोलन करणारे लोणीकर हेच होते. त्यावेळी लोणीकर यांच्या भूमिकेविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आताही शेतकरी संकटात असताना लोणीकर हे गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेतेही दूरच४जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहेत. राज्यस्तरावरील केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली आहे. भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मात्र यापासून दूरच आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस