शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : संपर्कमंत्री अन् पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांना वाºयावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:39 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरील खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. असे असताना संकटातील शेतकºयांना दिलासा देण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात दौरा करुन शेतकºयांना दिलासा दिला; परंतु, शिवसेनेचेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र जिल्ह्याकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जावून नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी वगळता सातही जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. एकमेव परभणी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी केलेली नाही. त्यामुळे असे पालकमंत्री काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तरी निवडणुकीपर्यंत जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांचा जिल्ह्यात राबता होता. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपर्कमंत्री लोणीकर हे गायब झाले. त्यांनी त्यांच्या जालना जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली; परंतु, संपर्कमंत्री म्हणून परभणीचा दौरा करण्याची तसदी त्यांना घ्याविशी वाटली नाही. विशेष म्हणजे दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यासाठी विरोध करुन आंदोलन करणारे लोणीकर हेच होते. त्यावेळी लोणीकर यांच्या भूमिकेविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आताही शेतकरी संकटात असताना लोणीकर हे गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेतेही दूरच४जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहेत. राज्यस्तरावरील केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली आहे. भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते मात्र यापासून दूरच आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस