शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठाचे एमएयुएस ७१ सोयाबीन वाण नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:45 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१८-१९ मध्ये सोयाबीन एमएयुएस ७१ या वाणाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला. महाबीजने हे वाण शुद्ध नसल्याचा अहवाल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील संचालक संशोधन विभागाला दिला आहे.दरम्यान या अहवालानंतर ४ डिसेंबर रोजी संचालक संचालनालयात कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर कुलगुरू डॉ.ढवण यांनी संचालक संशोधन यांच्या नावाने पत्र काढले असून, त्यात म्हटले आहे की, सोयाबीन एमएयुएस ७१ या वानाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला असून अनुवंशिक शुद्धते अभावी हा संपूर्ण बीजोत्पादन कार्यक्रम बाद ठरला आहे. विविध स्तरावर बियाणे उत्पादन कार्यक्रमात बियाणांची अनुवंशिक शुद्धता राखण्याकरिता योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागण्याबरोबरच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पिकांचा जो बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे, त्यानुषंगाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व संबंधितांनी काटेकोर पालन करावे व भविष्यात असा हलगर्जीपणा दिसून आल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना डॉ.ढवण यांनी संचालक संशोधक यांना दिल्या आहेत.भेसळयुक्त बिजपुरवठा; श्रीनिवास मुंडे यांची राज्यपालांकडे तक्रारया प्रकरणात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीज मंडळ व शेतकऱ्यांना सोयाबीन ७१ चा भेसळयुक्त बीजपुरवठा केल्याची तक्रार केली आहे. राज्यातील चारही विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना पायाभूत बियाणांचा पुरवठा करणे अपेक्षित आहे.अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बियाणे कृषी विद्यापीठाने पुरविल्यास शेतकºयांना जास्त उत्पादन मिळविता येईल. मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शुद्ध बियाणांमध्ये भेसळ करीत शुद्ध बियाणे म्हणून पुरवठा करून शेतकºयांची फसवणूक केली आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य सिड्स कार्पोरेशन लि. मार्फत कृषी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे.ही बाब गंभीर असून, भेसळयुक्त बियाणे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच विद्यापीठाचे कुलगुरू आणि संचालक संशोधन यांना बडतर्फ करावे, अशी मागणी कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ