शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
3
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
4
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
5
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
6
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
7
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
8
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
9
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
10
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
11
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
12
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
13
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
14
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
15
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
16
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
17
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
18
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
19
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
20
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:18 IST

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलूलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीजी वसतिगृहाशेजारील मैदानावर आयोजित परभणी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु बोलत होते़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालक डॉ़ पी़जी़ इंगोले, संशोधन संचालक डॉ़ डी़पी़ वासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे संचालक के़ आऱ सराफ यांची उपस्थिती होती़कुलगुरु व्यंकटेस्वरलू म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत उत्पादन घेत असतात़ परंतु, त्यांना मार्केटींगचे तंत्र अवगत नसल्याने उत्पन्नात वाढ होत नाही़ सर्व शेतकऱ्यांनी मार्केटींगचे तंत्र शिकून घेणे महत्त्वाचे आहे़ यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल़ शेतकºयांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी नवीन संशोधन केंद्र विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात येणार आहे़ यामध्ये शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातून संशोधन केले जाणार आहे़ जिल्हा कृषी महोत्सवात सेंद्रिय शेती उत्पादक गट आणि महिला गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाचा धान्य महोत्सव भरविण्यात आला असून, त्याचा प्रचार व प्रसार करून ग्राहकांना आकर्षित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले, शेतकºयांनी आपले उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, उत्पन्नाचे ग्रेडींग व पॅकेजिंग करून आॅनलाईन शेतीमाल विकल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल़ कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले़ डीपीडीसीच्या निधीतून सुपरमार्केटची इमारत उभी केली जाणार असून, याचा शेतकरी वर्गाला फायदा होईल़ यावेळी बोलताना विभागीय कृषी सहसंचालक भताने म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञानगंगा शेतकºयांच्या दारी आली आहे़ महोत्सवात मिळणारे ज्ञान अमूल्य आहे. यावेळी महापौर वरपूडकर, जि़प़ उपाध्यक्षा नखाते, देशमुख यांचीही भाषणे झाली़उल्लेखनीय कार्य करणाºया शेतकºयांचा गौरवया महोत्सवात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी ज्ञानोबा चट्टे, जितेंद्र देशमुख, अशोक देशमुख, सुरेश वाकणकर, विठ्ठल गिराम, हरिभाऊ निकम, सोपान आवचार, साहेबराव काकडे, मधुकर घुगे, तुकाराम दहे, सूर्यकांत देशमुख, शेषराव निरस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ महोत्सवातील प्रदर्शनात कृषी, सहकार, महसूल, समाजकल्याण, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशू संवर्धन आदी विभागांची दालने उभारण्यात आली आहेत़ हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे़

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीuniversityविद्यापीठagricultureशेती