शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:18 IST

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़

परभणी :शेतकरी, शास्त्रज्ञांच्या समन्वयातून प्रगती साधावी- बी़ व्यंकटेस्वरलूलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीजी वसतिगृहाशेजारील मैदानावर आयोजित परभणी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु बोलत होते़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालक डॉ़ पी़जी़ इंगोले, संशोधन संचालक डॉ़ डी़पी़ वासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे संचालक के़ आऱ सराफ यांची उपस्थिती होती़कुलगुरु व्यंकटेस्वरलू म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत उत्पादन घेत असतात़ परंतु, त्यांना मार्केटींगचे तंत्र अवगत नसल्याने उत्पन्नात वाढ होत नाही़ सर्व शेतकऱ्यांनी मार्केटींगचे तंत्र शिकून घेणे महत्त्वाचे आहे़ यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल़ शेतकºयांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी नवीन संशोधन केंद्र विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात येणार आहे़ यामध्ये शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातून संशोधन केले जाणार आहे़ जिल्हा कृषी महोत्सवात सेंद्रिय शेती उत्पादक गट आणि महिला गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाचा धान्य महोत्सव भरविण्यात आला असून, त्याचा प्रचार व प्रसार करून ग्राहकांना आकर्षित करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले, शेतकºयांनी आपले उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, उत्पन्नाचे ग्रेडींग व पॅकेजिंग करून आॅनलाईन शेतीमाल विकल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल़ कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले़ डीपीडीसीच्या निधीतून सुपरमार्केटची इमारत उभी केली जाणार असून, याचा शेतकरी वर्गाला फायदा होईल़ यावेळी बोलताना विभागीय कृषी सहसंचालक भताने म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक ज्ञानगंगा शेतकºयांच्या दारी आली आहे़ महोत्सवात मिळणारे ज्ञान अमूल्य आहे. यावेळी महापौर वरपूडकर, जि़प़ उपाध्यक्षा नखाते, देशमुख यांचीही भाषणे झाली़उल्लेखनीय कार्य करणाºया शेतकºयांचा गौरवया महोत्सवात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी ज्ञानोबा चट्टे, जितेंद्र देशमुख, अशोक देशमुख, सुरेश वाकणकर, विठ्ठल गिराम, हरिभाऊ निकम, सोपान आवचार, साहेबराव काकडे, मधुकर घुगे, तुकाराम दहे, सूर्यकांत देशमुख, शेषराव निरस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ महोत्सवातील प्रदर्शनात कृषी, सहकार, महसूल, समाजकल्याण, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशू संवर्धन आदी विभागांची दालने उभारण्यात आली आहेत़ हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे़

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीuniversityविद्यापीठagricultureशेती