शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

परभणीत अडीच हजार क्विंटल तुरीची केली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:36 IST

जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़परभणी जिल्ह्यात तुरीचे उत्पादक मोठ्या प्रमाणात झाले आहे़ शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे़ प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले़ साधारणत: १ ते दीड महिना हे केंद्र उशिरा सुरू झाल्याने तूर उत्पादकांची मोठी फरफट झाली़ घरात तूर येऊन पडली असताना हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात तुरीची विक्री करावी लागली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खुल्या बाजारपेठेत मात्र जास्तीत जास्त ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात आली़ त्यामुळे तूर उत्पादकांना क्विंटल मागे तब्बल १ ते दीड हजार रुपयांचा फटका सहन करावा लागला़ हमीभाव खरेदी केंद्रासाठी शेतकºयांची ओरड वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ पहिले केंद्र परभणी येथे ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाले तर गंगाखेड तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदीला सुरुवात करण्यात आली़ पाचही खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ १ कोटी ३३ लाख ६० हजार ६७५ रुपयांची तूर शासनाने खरेदी केली आहे़जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ त्या तुलनेत या आठ दिवसांत केवळ २२८ शेतकºयांची तूर खरेदी झाली़ नवीन पद्धतीनुसार नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जाणार आहे़ शासकीय तूर खरेदी केंद्राच्या वतीने तूर उत्पादकांना प्रत्येक दिवशी मोबाईलवर संदेश देऊन तूर विक्रीसाठी आणण्याचे सूचित केले जात आहे़ परंतु, तूर उत्पादक मात्र त्या तुलनेत प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे़हमीभाव खरेदी केंद्रावर बाजारपेठेच्या तुलनेत चांगला भाव मिळत असतानाही उत्पादकांनी मात्र पाठ फिरविली आहे़ अनेक शेतकºयांनी नोंदणीची झंजट नको म्हणून खुल्या बाजारपेठेतच तुरीची विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही तुरीच्या खरेदीला उठाव मिळेनासा झाला आहे़गंगाखेडमध्ये सर्वाधिक तूर खरेदीजिल्ह्यात परभणी, जिंतूर, गंगाखेड, सेलू आणि पूर्णा या पाच ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहेत़ विशेष म्हणजे गंगाखेड येथील खरेदी केंद्र सर्वात उशिराने १५ फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, अवघ्या सात दिवसांमध्ये या केंद्रावर ५० शेतकºयांची ६१७ क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ तर परभणी येथील खरेदी केंद्रावर १९ शेतकºयांची २७१ क्विंटल, जिंतूरच्या खरेदी केंद्रावर ७१ शेतकºयांची ५१६ क्विंटल, सेलू केंद्रावर ३७ शेतकºयांची ४२५ क्विंटल, पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ५१ शेतकºयांची ६२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़लाल रंगाच्या दोरीसाठी धावपळतूर खरेदी करताना ती कोणत्या विभागातून खरेदी झाली आहे़ हे लक्षात यावे, यासाठी यंदा शासनाने प्रत्येक विभागात तुरीचे पोते शिवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या दोºया वापरण्याचे निर्देश दिले आहेत़ मराठवाडा विभागासाठी लाल रंगाच्या दोरीने पोते टाचायचे आहे़ त्यामुळे लाल रंगाची दोरी शोधण्यासाठी कर्मचाºयांना धावपळ करावी लागली़ परभणीच्या बाजारपेठेत लाल रंगांच्या दोºया उपलब्ध असल्या तरी तालुक्याच्या ठिकाणी या दोºया मिळतील की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे मिळेल त्या दोरीला लाल रंगाने रंगवून पोते शिवले जात आहेत़आज सुरू होणार बोरीचे केंद्रबोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे़ या बाजार समितीत परिसरातील अनेक शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ विशेष म्हणजे खरेदी केंद्रासाठी या ठिकाणी आंदोलनही झाले होते़ या सर्व पार्श्वभूमीवर बोरी येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, २२ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात या केंद्राला सुरुवात होईल, अशी माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली़