शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला महिला कक्षाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:56 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी कार्यालयाच्या ठिकाणी महिला कक्ष उभारावा, असे शासनाचे आदेश आहेत. मागील काही वर्षांपासून शासकीय कामकाजात महिला कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला कक्ष उभारल्यानंतर दुपारच्या सुटीच्या वेळी महिला कर्मचारी कक्षात थांबू शकतात. त्याचप्रमाणे महिला कर्मचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये महिला कक्ष उभारण्याचे बंधन शासनाने घातले आहे.जिल्ह्यात इतर शासकीय कार्यालयांत असे कक्ष उभारण्यात आले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारण्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कार्यालयातील महिला कर्मचाºयांची कुचंबना होत आहे.‘कक्ष उपलब्ध करुन द्या’दरम्यान या प्रश्नी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ३० ते ३२ महिला अधिकारी/ कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध झाला तर दुपारचे भोजन, लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी होणारी कुचंबना थांबू शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातील खोली क्र.२३ मध्ये यापूर्वी महिला कक्ष कार्यरत होता. मात्र हा कक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दिल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे, स्वप्ना अंभोरे, वर्षा महामुनी, यु.बी. पुल्लेवार, आयेशा शेख, विशाखा वडमारे, प्रियंका गायकवाड, द्वारका गवारे आदींनी केली आहे.मागील दीड वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. स्वतंत्र महिला कक्ष नसल्याने महिला कर्मचाºयांची गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.