शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परभणी: समान निधी वाटपाला सत्ताधाºयांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:00 IST

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधी वाटपात शासनाच्या समान निधी वितरण निर्णयाला सत्ताधाºयांकडून खो दिला जात आहे. मिळालेल्या निधीपैकी जिंतूर तालुक्यालाच तब्बल ५० टक्के निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित ८ तालुक्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप जि.प.तील काँग्रेस व शिवसेना या विरोधी पक्ष नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधी वाटपात शासनाच्या समान निधी वितरण निर्णयाला सत्ताधाºयांकडून खो दिला जात आहे. मिळालेल्या निधीपैकी जिंतूर तालुक्यालाच तब्बल ५० टक्के निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित ८ तालुक्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप जि.प.तील काँग्रेस व शिवसेना या विरोधी पक्ष नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते राम खराबे यांच्या कक्षात काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जि.प.सदस्य राम खराबे म्हणाले की, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीपैकी तब्बल ५० टक्के निधी एकट्या जिंतूर तालुक्यालाच वितरित करण्यात आला आहे. उर्वरित ८ तालुक्यांमध्ये ५० टक्के निधी देऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. सर्वसाधारण सभेमध्ये निधी वितरणाचा एक ठराव घेतला जातो व नंतर परस्पर बदलून वेगळीच कामे प्रस्तावित केली जातात, असेही त्यांनी सांगितले. जलसंधारण अंतर्गत मिळालेल्या ११ कोटींपैकी ५ कोटी ३८ लाख जिंतूर मतदारसंघालाच वितरित केले असून बांधकाम विभागाला मिळालेल्या ५ कोटी ३४ लाखांपैकी २ कोटी १४ लाख एकट्या जिंतूरलाच देण्यात आले आहेत. जनसुविधेअंतर्गत १ कोटी ७२ लाखांपैकी १ कोटी ३३ लाख रुपये जिंतूर तालुक्याला देण्यात आले. समाजकल्याणचा निधी केवळ पदाधिकाºयांच्या निष्क्रियतेमुळे अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे. ती एका तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठीची आहे, असे ते म्हणाले.यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड म्हणाले की, शासनाच्या १९६१ च्या समान निधी वाटप कायद्याला अडगळीत टाकून सत्ताधाºयांकडून पदाचा दुरुपयोग केला जात आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन निधी वितरित न करता मनमानी केली जात आहे. या संदर्भात जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे तक्रार करुनही त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. ते स्वत:च कार्यालयामध्ये फार वेळ बसत नाहीत. परिणामी अनेक विभागप्रमुख व कर्मचारीही पूर्णवेळ कार्यालयात नसतात. त्यामुळे प्रशासकीय कामांचा खोळंबा होत आहे. समान निधी वाटप न झाल्यास विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असून या त्या उपरही कारवाई नाही झाल्यास न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना शिवसेनेचे रवि पतंगे म्हणाले की, बांधकाम विभागातही निधी वितरणात अन्याय झालेला आहे. जि.प.त सध्या निधी वाटपाचा बाजार सुरु आहे. विरोधी पक्षाचे सदस्य ज्या सर्कलमधून निवडून आले, त्या सर्कलमध्ये काही एजंट निधी वाटपासाठी फिरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. जिंतूरमध्येही केवळ आडगाव आणि बोरीलाच प्राधान्य दिले जात असून या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या इतर सदस्यांवरही अन्याय केला जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सदस्यही नाराज असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जि.प.सदस्य विष्णू मांडे, जनार्दन सोनवणे, माणिक घुंबरे, रंगनाथ वाकणकर आदींची उपस्थिती होती.