शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

परभणी : रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:27 IST

खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.गतवर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९ पैकी ६ तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले. या यादीत पाथरी तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी खरीप व रबी हंगामात पेरणी केली. त्या शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांना पुन्हा उसणवारी व बँकांच्या दारात पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी उभे रहावे लागले. बँक प्रशासनाने पीक कर्ज वाटपात घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत लोटणारा ठरत आहे. त्यामुळे उसणवारी करून शेतकºयांना बी बियाणे व खते खरेदी करावी लागत आहेत. त्यातच एप्रिल २०१९ पासून रासायनिक खताच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एका बॅगच्या पाठीमागे साधारणपणे २०० पेक्षा अधिक किंमत वाढल्याचे दिसून येत आहे. पाथरी शहरात बी बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशकाची परवानाधारक ३५ ते ४० दुकाने आहेत. गतवर्षी मार्च अखेर जवळपास सर्वच दुकानदारांकडे जुन्या दरातील एमआरपी असलेल्या खताचा साठा शिल्लक होता. जुन्या किंमतीत असलेल्या खताचा साठा त्याच किंमतीत विक्री करणे अपेक्षित आहे; परंतु, शहरातील काही व्यापारी जुन्या किंमतीमधील खत नवीन एमआरपीमध्ये विक्री करीत आहेत. एका बॅगमध्ये २०० रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुकानदारांकडून शेतकºयांची होणारी फसवणूक कृषी विभाग उघड्या डोळ्याने पाहत आहे; परंतु, कारवाईसाठी पुढे येत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पावसाअभावी : पेरण्या खोळंबल्याच्मृगनक्षत्रात पाऊस पडला नाही. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील हादगाव, पाथरगव्हाण या भागात हलका पाऊस पडला. बाभळगाव पट्टा अद्यापही कोरडा पडला आहे. परिणामी पावसाअभावी पेरणी खोळंबली आहे. या आठवड्यात पाऊस झाला तर बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकºयांची बाजारपेठेत मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा व्यापारी घेऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन जुन्या एमआरपीचा खत नवीन किंमतीत विकणाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.असे आहेत नवीन दर४१०-२६-२६ या खताची बॅग ११८० रुपयांना मिळत होती. ती आता १३६० रुपयांवर जाऊन पोहचली आहे. त्याच बरोबर १५-१५-१५ या प्रकारातील खत ९८० रुपयांना प्रती बॅग होती. आता नवीन दरानुसार १०७० रुपये शेतकºयांना एका बॅगसाठी मोजावे लागणार आहेत.४डीएपी नावाचा खत जुन्या दरामध्ये १२३० रुपयांना मिळत होता. तो आता १३७० रुपयांना विक्री होत आहे. १८-१८-१० हा खत ८४० रुपयांंना बाजारामध्ये उपलब्ध होता. तो आता १०२० रुपयांना मिळणार आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.रासायनिक खताच्या किंमती यावर्षी वाढल्या आहेत. जुन्या दरातील शिल्लक असलेला खत त्याच एमआरपीमध्ये विक्री करणे आवश्यक आहे. मात्र जुन्या दरातील खत वाढीव एमआरपीमध्ये विक्री केल्याचे उघड झाल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.-कुपटेकर, कृषी अधिकारी,पं.स. पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस