शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी : रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:27 IST

खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.गतवर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९ पैकी ६ तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले. या यादीत पाथरी तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी खरीप व रबी हंगामात पेरणी केली. त्या शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांना पुन्हा उसणवारी व बँकांच्या दारात पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी उभे रहावे लागले. बँक प्रशासनाने पीक कर्ज वाटपात घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत लोटणारा ठरत आहे. त्यामुळे उसणवारी करून शेतकºयांना बी बियाणे व खते खरेदी करावी लागत आहेत. त्यातच एप्रिल २०१९ पासून रासायनिक खताच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एका बॅगच्या पाठीमागे साधारणपणे २०० पेक्षा अधिक किंमत वाढल्याचे दिसून येत आहे. पाथरी शहरात बी बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशकाची परवानाधारक ३५ ते ४० दुकाने आहेत. गतवर्षी मार्च अखेर जवळपास सर्वच दुकानदारांकडे जुन्या दरातील एमआरपी असलेल्या खताचा साठा शिल्लक होता. जुन्या किंमतीत असलेल्या खताचा साठा त्याच किंमतीत विक्री करणे अपेक्षित आहे; परंतु, शहरातील काही व्यापारी जुन्या किंमतीमधील खत नवीन एमआरपीमध्ये विक्री करीत आहेत. एका बॅगमध्ये २०० रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुकानदारांकडून शेतकºयांची होणारी फसवणूक कृषी विभाग उघड्या डोळ्याने पाहत आहे; परंतु, कारवाईसाठी पुढे येत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पावसाअभावी : पेरण्या खोळंबल्याच्मृगनक्षत्रात पाऊस पडला नाही. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील हादगाव, पाथरगव्हाण या भागात हलका पाऊस पडला. बाभळगाव पट्टा अद्यापही कोरडा पडला आहे. परिणामी पावसाअभावी पेरणी खोळंबली आहे. या आठवड्यात पाऊस झाला तर बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकºयांची बाजारपेठेत मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा व्यापारी घेऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन जुन्या एमआरपीचा खत नवीन किंमतीत विकणाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.असे आहेत नवीन दर४१०-२६-२६ या खताची बॅग ११८० रुपयांना मिळत होती. ती आता १३६० रुपयांवर जाऊन पोहचली आहे. त्याच बरोबर १५-१५-१५ या प्रकारातील खत ९८० रुपयांना प्रती बॅग होती. आता नवीन दरानुसार १०७० रुपये शेतकºयांना एका बॅगसाठी मोजावे लागणार आहेत.४डीएपी नावाचा खत जुन्या दरामध्ये १२३० रुपयांना मिळत होता. तो आता १३७० रुपयांना विक्री होत आहे. १८-१८-१० हा खत ८४० रुपयांंना बाजारामध्ये उपलब्ध होता. तो आता १०२० रुपयांना मिळणार आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.रासायनिक खताच्या किंमती यावर्षी वाढल्या आहेत. जुन्या दरातील शिल्लक असलेला खत त्याच एमआरपीमध्ये विक्री करणे आवश्यक आहे. मात्र जुन्या दरातील खत वाढीव एमआरपीमध्ये विक्री केल्याचे उघड झाल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.-कुपटेकर, कृषी अधिकारी,पं.स. पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस