शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

परभणी : डाव्या कालव्याचे पाणी नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:13 IST

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता निकाली निघाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्याने सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असून, हे पाणी नदीपात्रातून ढालेगाव, झरी, खडका आणि डिग्रस बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या भागातील प्रमुख शहरांबरोबरच अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता निकाली निघाला आहे़जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ओढे, नाले, बंधारे कोरडेठाक आहेत़ परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे़ पावसाळ्यात बंधारे आणि प्रकल्प पाण्याने भरणे अपेक्षित होते़ मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अजूनही कायम आहे़या सर्व पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालवा आणि नदीपात्रात सोडावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत होती़या मागणीची दखल घेत जायकवाडी पाटबंधारे विभागाने कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी नोंदविली होती़ त्यानुसार जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने सोडलेले पाणी १६ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील वरखेड (ता़ पाथरी) येथील गेटपर्यंत पोहचले आहे़ या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बंधाऱ्यांत पाणी सोडले जात आहे़जायकवाडी डाव्या कालव्यातून पाथरी आणि मानवत या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती़ त्यानुसार मानवत शहराला पाणीपुरवठा करणाºया झरी तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जाणार असून, पाथरी शहराला पाणीपुरवठा करणाºया ढालेगाव बंधाºयात ३़३६ दलघमी पाणी दिले जाणार आहे़पाथरी शहराला वर्षभरासाठी ३़३६ दलघमी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असल्याने हे पाणी बंधाºयात सोडले जाणार आहे़ १६ आॅगस्ट रोजी डाव्या कालव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आता ढालेगाव बंधाºयापर्यंत पोहचत आहे़ जायकवाडी प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यात दाखल झाल्याने पाथरी, मानवत, पालम या प्रमुख शहरांबरोबरच ढालेगाव बंधाºयावर आधारित असलेल्या रामपुरी, ढालेगाव, निवळी, मरडसगाव, मंजरथ, पाटोदा, गोपेगाव, नाथ्रा या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ पाथरी, मानवत या दोन्ही तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे़संपूर्ण पावसाळ्यात एकदाही मोठा पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती असून, जायकवाडीच्या पाण्यामुळे या गावांना दिलासा मिळाला आहे़ शिवाय परिसरातील पाणी पातळी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे़परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी ५ दलघमी४परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी ५ दलघमी पाण्याची मागणी नोंदविण्यात आली असून, या औष्णिक विद्युत केंद्रासाठी परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याच्या १५९ सीआर गेटवरून ३७५ क्युसेसने खडका बंधाºयात पाणी सोडण्यात आले आहे़४गेटपासून खडका बंधारा साधारणत: ४० किमी अंतरावर असून, ५ दलघमी पाणी देण्यासाठी या बंधाºयात २० दलघमी पाणी सोडले जाणार आहे़झरी तलावात ६२ टक्के पाणीमानवत शहराला पाणी पुरवठा करणाºया झरी येथील तलावात २०० क्युसेसने पाणी सोडले जात आहे़ १़८७ दलघमी क्षमतेचा हा तलाव पूर्णपणे भरला जाणार आहे़ सध्या या तलावात १़१ दलघमी पाणीसाठा जमा झाला असून, ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे़डाव्या कालव्यातूनच ढालेगाव बंधाºयातही पाणी दिले जात आहे़ ढालेगाव बंधाºयासाठी १५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे़ कालव्यातील पाणी २०० क्युसेसने सोडले तर वरखेड गावाजवळील पुलावरून पाणी जाते़ त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी १५० क्युसेसने ढालेगाव बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले असून, नदीपात्रातून हे पाणी बंधाºयात दाखल होत आहे़ढालेगावच्या बंधाºयाचे बॅक वॉटर २२ किमी अंतराचे असून, १३़५५ दलघमी क्षमताचा हा बंधारा असला तरी बंधाºयात केवळ ३़३६ दलघमी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागातून देण्यात आली़डिग्रस, खडका : बंधाºयासाठीही पाणी४डाव्या कालव्यातून निघालेले पाणी पालम तालुक्यातील डिग्रस आणि सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाºयातही सोडले जाणार आहे़ डिग्रस हा उच्च पातळी बंधारा असून, ६३़५५ दलघमी क्षमतेचा हा बंधारा आहे़४या बंधाºयात १़५१ दलघमी पाणी सोडले आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील १८७ सीआर या गेटमधून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, गेटपासून बंधाºयाचे अंतर २० किमी एवढे आहे़४त्यामुळे डिग्रस बंधाºयातील पाण्यावर अवलंबून असणाºया अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प