शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ई-आॅफीस अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांमधून सर्वाधिक कामे केली जातात़ जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या सर्व कार्यालयांमध्ये दररोज महत्त्वपूर्ण निर्णय होतात़ सद्यस्थितीला जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांमधून होणारे कामकाज हे आॅफलाईन आहे़ निर्णयांचे आदेश काढणे, दाखल झालेल्या तक्रारी किंवा फाईलींवर मॅन्युअली कामकाज केले जाते़ या कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी सर्व कामकाज पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी घेतला आहे़या निर्णयानुसार ई-आॅफीस ही संकल्पना अंमलात आणली जाणार आहे़ या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेला कोणताही कागद पहिल्याच टप्प्याला स्कॅन करून तो आॅनलाईन केला जाणार आहे़ दाखल झालेल्या तक्रारी, विविध योजनांच्या फाईली पेपरलेस केल्या जाणार असून, संगणकावरच या फाईलींवर निर्णय घेणे, शेरा देणे तसेच पुढील अधिकाºयांकडे ही फाईल पाठविणे आणि अंतिमत: निर्णय घेऊन संगणकामार्फतच तो संबंधिताला कळविण्याची सुविधा निर्माण केली आहे़ या प्रक्रियेमुळे प्रत्येक विषयावर बारकाईने लक्ष ठेवणे सोयीचे होणार आहे़ त्याचप्रमाणे एखादे काम अडले असले तर ते नेमके कुठे अडले आहे? कामात दिरंगाई का होत आहे? या सर्व बाबी स्पष्ट होणार असून, त्यातून प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे़ मागील सहा महिन्यांपासून या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे़ या अंतर्गत सर्व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ तसेच आवश्यक त्या बाबीही पूर्ण करण्यात आल्या असून, सद्यस्थितीला ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत़एनआयसी अंतर्गत ई आॅफीसची अंमलबजावणी केली जात असून, मुंबई येथील एनआयसीचे अधिकारी यावर नियंत्रण ठेवून आहेत़ जिल्ह्यात सध्या ई आॅफीसची डेमो साईट सुरू आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांचा त्यावर सरावही होत आहे़ ५ मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे़ सध्या अधिकारी, कर्मचाºयांच्या शंकांचे निरसन या माध्यमातून केले जात असून, एनआयसीकडून हे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाकाजाला सुरुवात होणार आहे़ई आॅफीसची ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे दररोज या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत़ या प्रक्रियेवर सध्या सुरू असलेले कामकाज लक्षात घेता जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात प्रत्यक्ष ई आॅफीसच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली़ दरम्यान, या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होऊन सुविधा मिळणार आहेत़शासकीय संकेतस्थळावर ई-मेलई आॅफीसमध्ये कामकाज करीत असताना सर्व अधिकारी, कर्मचाºयांचे ई-मेल आयडी शासकीय संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे़ मागील काही महिन्यांपासून ईमेल आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे़ ९५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांचे ईमेल आयडीही तयार झाले आहेत़ त्याच प्रमाणे सर्व कामे आॅनलाईन होणार असल्याने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांची डिजिटल स्वाक्षरी या प्रणालीमध्ये आवश्यक आहे़ जिल्ह्यातील ७० टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे या दोन महत्त्वाच्या बाबी अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्यक्ष कामकाजही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातही ही प्रणाली लागू होणार असल्याने या कार्यालयातील संगणक लॅन करणे, इंटरनेट सुविधा देण्याचे काम पूर्ण झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी