शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

परभणी : ई-आॅफीस अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांमधून सर्वाधिक कामे केली जातात़ जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या सर्व कार्यालयांमध्ये दररोज महत्त्वपूर्ण निर्णय होतात़ सद्यस्थितीला जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांमधून होणारे कामकाज हे आॅफलाईन आहे़ निर्णयांचे आदेश काढणे, दाखल झालेल्या तक्रारी किंवा फाईलींवर मॅन्युअली कामकाज केले जाते़ या कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी सर्व कामकाज पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी घेतला आहे़या निर्णयानुसार ई-आॅफीस ही संकल्पना अंमलात आणली जाणार आहे़ या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेला कोणताही कागद पहिल्याच टप्प्याला स्कॅन करून तो आॅनलाईन केला जाणार आहे़ दाखल झालेल्या तक्रारी, विविध योजनांच्या फाईली पेपरलेस केल्या जाणार असून, संगणकावरच या फाईलींवर निर्णय घेणे, शेरा देणे तसेच पुढील अधिकाºयांकडे ही फाईल पाठविणे आणि अंतिमत: निर्णय घेऊन संगणकामार्फतच तो संबंधिताला कळविण्याची सुविधा निर्माण केली आहे़ या प्रक्रियेमुळे प्रत्येक विषयावर बारकाईने लक्ष ठेवणे सोयीचे होणार आहे़ त्याचप्रमाणे एखादे काम अडले असले तर ते नेमके कुठे अडले आहे? कामात दिरंगाई का होत आहे? या सर्व बाबी स्पष्ट होणार असून, त्यातून प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे़ मागील सहा महिन्यांपासून या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे़ या अंतर्गत सर्व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ तसेच आवश्यक त्या बाबीही पूर्ण करण्यात आल्या असून, सद्यस्थितीला ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत़एनआयसी अंतर्गत ई आॅफीसची अंमलबजावणी केली जात असून, मुंबई येथील एनआयसीचे अधिकारी यावर नियंत्रण ठेवून आहेत़ जिल्ह्यात सध्या ई आॅफीसची डेमो साईट सुरू आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांचा त्यावर सरावही होत आहे़ ५ मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे़ सध्या अधिकारी, कर्मचाºयांच्या शंकांचे निरसन या माध्यमातून केले जात असून, एनआयसीकडून हे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाकाजाला सुरुवात होणार आहे़ई आॅफीसची ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे दररोज या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत़ या प्रक्रियेवर सध्या सुरू असलेले कामकाज लक्षात घेता जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात प्रत्यक्ष ई आॅफीसच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली़ दरम्यान, या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होऊन सुविधा मिळणार आहेत़शासकीय संकेतस्थळावर ई-मेलई आॅफीसमध्ये कामकाज करीत असताना सर्व अधिकारी, कर्मचाºयांचे ई-मेल आयडी शासकीय संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे़ मागील काही महिन्यांपासून ईमेल आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे़ ९५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांचे ईमेल आयडीही तयार झाले आहेत़ त्याच प्रमाणे सर्व कामे आॅनलाईन होणार असल्याने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांची डिजिटल स्वाक्षरी या प्रणालीमध्ये आवश्यक आहे़ जिल्ह्यातील ७० टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे या दोन महत्त्वाच्या बाबी अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्यक्ष कामकाजही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातही ही प्रणाली लागू होणार असल्याने या कार्यालयातील संगणक लॅन करणे, इंटरनेट सुविधा देण्याचे काम पूर्ण झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी