शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:47 IST

शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन, उडीद व मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही़ मात्र उत्पादित शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर शेतकºयांची अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेड व राज्य शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास परवागनी मिळाली़ २० नोव्हेंबरपासून या सहा केंद्रांपैकी चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़१० दिवस उलटले असतानाही किलोभरही सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांकडून करण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आपला शेतीमाल पडेल भावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खाजगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे़ परंतु, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे़दुष्काळी परिस्थिती सापडलेल्या शेतकºयांसाठी लोकप्रतिनिधींनी तरी पुढे येथून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा शेतमाल घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांमधून करण्यात येत आहे़११ हजार ९० शेतकºयांनी केली नोंदणीजिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ९० शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ २ हजार ९६४ मूग उत्पादकांनी, ३५२ उडीद तर ७ हजार ७९२ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला आहे; परंतु, हमीभाव खरेदी केंद्रांवर संथगतीच्या कारभाराने शेतकºयांचा शेतमाल नोंदणी करूनही घरातच पडून राहतो की काय अशी शंका शेतकºयांच्या उपस्थित होत आहे़४दरम्यान, परभणी व सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ कार्यान्वित करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांतून होत आहे़़़़ तर शेत मालाला मिळेल भावजिल्ह्यातील सहाही ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तर खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल़ परंतु, जिल्ह्यातील सहापैकी चार ठिकाणचे हमीभाव खरेदी केंद्र २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहेत़ परंतु, सोयाबीनची खरेदी अद्यापही झालेली नाही़ त्यातच परभणी व सेलू केंद्राला खरेदीसाठी मुहूर्तच मिळाला नाही़ याचा फायदा खाजगी व्यापारी उठवित आहेत़सोयाबीन परभणी येथील केंद्रावर १ हजार ९३८ शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे़ त्याचबरोबर जिंतूर २ हजार ३७९, सेलू १ हजार ६५७, पालम १३००, पाथरी २९७ तर पूर्णा तालुक्यात २६१ अशा एकूण ७ हजार ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परंतु, एकाही शेतकºयाचा माल खरेदी केला नाही़मूग विक्रीसाठी जिल्ह्यातील २ हजार ९४६ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़; परंतु, आतापर्यंत केवळ ३७९ क्विंटल ५३ किलोचीच खरेदी करण्यात आली आहे़ परभणी येथील केंद्रांवर ६१५, जिंतूर २२०, सेलू १३४२, पालम २३०, पाथरी ३८४ तर पूर्णा तालुक्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ या ठिकाणीही संथगतीचा फटका बसत आहे़उडीद विक्रीसाठी ३५२ शेतकºयांनी नोंदणी करून केवळ ९७ क्विंटल ४६ किलोचीच खरेदी झाली आहे़ परभणी केंद्रावर ३२, जिंतूर २२७, सेलू ६०, पालम १०, पाथरी ११ तर पूर्णा तालुक्यातील १२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मात्र खरेदी संथगतीने होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती