शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:47 IST

शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन, उडीद व मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही़ मात्र उत्पादित शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर शेतकºयांची अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेड व राज्य शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास परवागनी मिळाली़ २० नोव्हेंबरपासून या सहा केंद्रांपैकी चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़१० दिवस उलटले असतानाही किलोभरही सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांकडून करण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आपला शेतीमाल पडेल भावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खाजगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे़ परंतु, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे़दुष्काळी परिस्थिती सापडलेल्या शेतकºयांसाठी लोकप्रतिनिधींनी तरी पुढे येथून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा शेतमाल घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांमधून करण्यात येत आहे़११ हजार ९० शेतकºयांनी केली नोंदणीजिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ९० शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ २ हजार ९६४ मूग उत्पादकांनी, ३५२ उडीद तर ७ हजार ७९२ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला आहे; परंतु, हमीभाव खरेदी केंद्रांवर संथगतीच्या कारभाराने शेतकºयांचा शेतमाल नोंदणी करूनही घरातच पडून राहतो की काय अशी शंका शेतकºयांच्या उपस्थित होत आहे़४दरम्यान, परभणी व सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ कार्यान्वित करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांतून होत आहे़़़़ तर शेत मालाला मिळेल भावजिल्ह्यातील सहाही ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तर खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल़ परंतु, जिल्ह्यातील सहापैकी चार ठिकाणचे हमीभाव खरेदी केंद्र २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहेत़ परंतु, सोयाबीनची खरेदी अद्यापही झालेली नाही़ त्यातच परभणी व सेलू केंद्राला खरेदीसाठी मुहूर्तच मिळाला नाही़ याचा फायदा खाजगी व्यापारी उठवित आहेत़सोयाबीन परभणी येथील केंद्रावर १ हजार ९३८ शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे़ त्याचबरोबर जिंतूर २ हजार ३७९, सेलू १ हजार ६५७, पालम १३००, पाथरी २९७ तर पूर्णा तालुक्यात २६१ अशा एकूण ७ हजार ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परंतु, एकाही शेतकºयाचा माल खरेदी केला नाही़मूग विक्रीसाठी जिल्ह्यातील २ हजार ९४६ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़; परंतु, आतापर्यंत केवळ ३७९ क्विंटल ५३ किलोचीच खरेदी करण्यात आली आहे़ परभणी येथील केंद्रांवर ६१५, जिंतूर २२०, सेलू १३४२, पालम २३०, पाथरी ३८४ तर पूर्णा तालुक्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ या ठिकाणीही संथगतीचा फटका बसत आहे़उडीद विक्रीसाठी ३५२ शेतकºयांनी नोंदणी करून केवळ ९७ क्विंटल ४६ किलोचीच खरेदी झाली आहे़ परभणी केंद्रावर ३२, जिंतूर २२७, सेलू ६०, पालम १०, पाथरी ११ तर पूर्णा तालुक्यातील १२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मात्र खरेदी संथगतीने होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती