शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:47 IST

शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन, उडीद व मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही़ मात्र उत्पादित शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर शेतकºयांची अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेड व राज्य शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास परवागनी मिळाली़ २० नोव्हेंबरपासून या सहा केंद्रांपैकी चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़१० दिवस उलटले असतानाही किलोभरही सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांकडून करण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आपला शेतीमाल पडेल भावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खाजगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे़ परंतु, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे़दुष्काळी परिस्थिती सापडलेल्या शेतकºयांसाठी लोकप्रतिनिधींनी तरी पुढे येथून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा शेतमाल घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांमधून करण्यात येत आहे़११ हजार ९० शेतकºयांनी केली नोंदणीजिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ९० शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ २ हजार ९६४ मूग उत्पादकांनी, ३५२ उडीद तर ७ हजार ७९२ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला आहे; परंतु, हमीभाव खरेदी केंद्रांवर संथगतीच्या कारभाराने शेतकºयांचा शेतमाल नोंदणी करूनही घरातच पडून राहतो की काय अशी शंका शेतकºयांच्या उपस्थित होत आहे़४दरम्यान, परभणी व सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ कार्यान्वित करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांतून होत आहे़़़़ तर शेत मालाला मिळेल भावजिल्ह्यातील सहाही ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तर खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल़ परंतु, जिल्ह्यातील सहापैकी चार ठिकाणचे हमीभाव खरेदी केंद्र २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहेत़ परंतु, सोयाबीनची खरेदी अद्यापही झालेली नाही़ त्यातच परभणी व सेलू केंद्राला खरेदीसाठी मुहूर्तच मिळाला नाही़ याचा फायदा खाजगी व्यापारी उठवित आहेत़सोयाबीन परभणी येथील केंद्रावर १ हजार ९३८ शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे़ त्याचबरोबर जिंतूर २ हजार ३७९, सेलू १ हजार ६५७, पालम १३००, पाथरी २९७ तर पूर्णा तालुक्यात २६१ अशा एकूण ७ हजार ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परंतु, एकाही शेतकºयाचा माल खरेदी केला नाही़मूग विक्रीसाठी जिल्ह्यातील २ हजार ९४६ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़; परंतु, आतापर्यंत केवळ ३७९ क्विंटल ५३ किलोचीच खरेदी करण्यात आली आहे़ परभणी येथील केंद्रांवर ६१५, जिंतूर २२०, सेलू १३४२, पालम २३०, पाथरी ३८४ तर पूर्णा तालुक्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ या ठिकाणीही संथगतीचा फटका बसत आहे़उडीद विक्रीसाठी ३५२ शेतकºयांनी नोंदणी करून केवळ ९७ क्विंटल ४६ किलोचीच खरेदी झाली आहे़ परभणी केंद्रावर ३२, जिंतूर २२७, सेलू ६०, पालम १०, पाथरी ११ तर पूर्णा तालुक्यातील १२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मात्र खरेदी संथगतीने होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती