शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

परभणी : ३० लाखांचा अपहार; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:01 IST

तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा(परभणी) : तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचासाठी पूर्णा येथील कृषी कार्यालयात कुठलाही अर्ज केला नसताना तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शेतकरी सूर्यभान गंगाधर लोखंडे यांच्या नावे बोगस कागदपत्र तयार करून संच व त्यावरील मिळणारे २४ हजार ९८० रुपयांचे अनुदान परस्पर उचलण्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता.याप्रकरणी सूर्यभान लोखंडे यांनी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. उपविभागीय कृषी अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी खुपसे यांच्या तक्रारीवरून पूर्ण पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूर्ण पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत पवार यांनी तपास केला. या प्ररकरणाच्या खोलात गेल्यानंतर पूर्णा तालुक्यात या योजनेअंतर्गत अशाच पद्धतीने ३०६ शेतकºयांचे कागदपत्रे तयार करून ताडकळस येथील बँकेत बनावट खाते उघडून तब्बल तीस लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात कृषी विभाग, बँकेचे अधिकारी, व्यापारी यांचे मोठे रॅकेट असल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींपैकी हरीष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला होता. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांनी सादर केल्यानंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यामुळे २७ जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी हरिष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड या दोघांना नांदेड येथून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, नितीन वडकर, विष्णू भिसे, यांनी ही कामगिरी केली. शेतकºयांच्या हितासाठी सुरू केलेल्या या योजनेत अपहार झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfraudधोकेबाजीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प