शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

परभणी : सहा वर्षांमध्ये केवळ ६१३ विहिरींचीच कामे झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांमध्ये ८२० विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट पंचायत समितीला देण्यात आले होते; परंतु, पं़स़च्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ६१३ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे़ अद्याप २०७ विहिरींचे काम अर्धवट आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांमध्ये ८२० विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट पंचायत समितीला देण्यात आले होते; परंतु, पं़स़च्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ६१३ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे़ अद्याप २०७ विहिरींचे काम अर्धवट आहे़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ‘कामे नरेगाची शाश्वत विकासाची’ हे ब्रिदवाक्य घेऊन तालुक्यात शेतीपूरक कामांना सुरुवात करण्यात आली़ तसेच गावातील मजुरांना गावातच काम उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने शेतकºयांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ही योजना अंमलात आणली़; परंतु, या योजनेत काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होवू शकली नाही़ या योजनेंतर्गत असलेली कामे प्राधान्यक्रमाने करावीत, असे आदेश देण्यात आले होते; परंतु, पंचायत समितीमधील अधिकाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे याही कामांना तालुक्यात ब्रेकच लागल्याचे दिसून येत आहे़ महात्मा गांधी रोजगार हमी योजना व समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत २०१२ ते २०१८ या सहा वर्षांमध्ये परभणी तालुक्यातील शेतकºयांसाठी ८२० विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट परभणी पंचायत समितीला देण्यात आले होते; परंतु, या विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ६१३ विहिरींचीच कामे पूर्ण झाली आहेत़ अजूनही २०७ विहिरींची काम अपूर्ण अवस्थेत आहेत़ प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे शासनाच्या लोकाभिमूख योजनांचा बोजवारा उडत असल्याचे यावरून दिसून येत आहे़ तालुक्याला देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाले असते तर तालुक्यातील अनेक शेतकºयांना या योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ होवून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हातभार लागला असता़ मात्र असे होताना दिसून येत नाही़११ कोटी ६१ लाखांचा झाला खर्चमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहा वर्षांमध्ये तालुक्यातील ६१३ लाभार्थ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला आहे़ विहिरींच्या या खोदकाम व बांधकामावर आतापर्यंत ११ कोटी ६१ लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ यामध्ये मजुरांवर ६ कोटी ३९ लाख ४० हजार रुपये तर विहिरींच्या बांधकामांवर ५ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ २०७ विहिरींचे काम प्रस्तावित आहे़ त्यामुळे या विहिरींवरही मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे़ शासन एवढा खर्च शेतकºयांसाठी करीत असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या योजनेसाठी वेळ देऊन पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार