शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परभणी : ज्वारीच्या विम्याचे दीड कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:54 IST

विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.२०१८ मधील रबी हंगामातील ज्वारीचा पीक विमा परभणी तालुक्यातील ५६ गावातील १७ हजार शेतकऱ्यांनी काढला होता. त्यापैकी १४ हजार शेतकºयांना भारती एक्सा या कंपनीने पीक विम्याची नुकसान भरपाई दिली. तांत्रिक कारणे सांगून ३ हजार ७०० शेतकºयांना या पीक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. १७ जुलै रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील भारती एक्सा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील परभणी तालुक्यातील रब्बी हंगामातील पीक विम्याचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. त्यानंतर भारती एक्सा कंपनीने झालेली चूक मान्य करत उर्वरित ३ हजार ७०० पैकी २ हजार ६२४ शेतकºयांना पीक विम्याच्या भरपाईपोटी १ कोटी ४७ लाख ४८ हजार ३०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करत असल्याचे पत्र आ.डॉ.राहुल पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी २७ जुलै रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चोपडे, गोपीनाथ तुडमे, सोपान आरमळ, दामोदर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, शिवाजी गरुड आदींची उपस्थिती होती.आ.राहुल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकºयांच्या रबीच्या ज्वारीचे दीड कोटी मिळणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा