शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

परभणी : तापमानाने वाढली दुष्काळाची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:25 AM

जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वातावरणात थंडी निर्माण झाली होती; परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान वाढू लागले. सोमवारी जिल्ह्यात ४० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारीही पारा वाढत जावून ४०.५ अंशावर स्थिरावला. तापमानाने ४० गाठल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच ऊन तापले होते. कडक उन्हामुळे दिवसभर उकाडाही निर्माण झाला होता.दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यापुढील चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २७ मार्च रोजी ४१, २८ मार्च रोजी ४०, २९ मार्च रोजी ४१ आणि ३० मार्च रोजी परभणीचा पारा ४२ अंशावर पोहचण्याचा अंदाज वर्तविला आहे.कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसमी सेवा या विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान तापमानामध्ये ३० मार्चपर्यंत २४ अंशापर्यंतची वाढ वर्तविली आहे. सध्या हे तापमान २१ अंशापर्यंत आहे. किमान तापमानात वाढ झाल्यानंतर रात्रीच्या वेळी देखील वातावरणातील उकाडा वाढणार आहे.कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दिवसा तीव्र उन्हाचे चटके तर रात्रीच्या वेळी अस्वस्थ करणाऱ्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या हा त्रास सुरु झाला असल्याने नागरिकांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये पांढरे रुमाल आणि टोप्या, गॉगल्सची विक्री वाढली आहे. तसेच कूलर, फॅन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी वाढली आहे.टंचाईत पडली भर४यावर्षी परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऊन वाढत चालल्याने भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात खोल जात आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई