शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: विमा कंपनीने घेतले २७८ कोटी, दिले मात्र ६१ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:38 IST

खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली होती. त्यामुळे विमा कंपनीकडे २७८ कोटी रुपये जमा झाले; परंतु, दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देताना मात्र केवळ ६१ कोटी ५२ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली होती. त्यामुळे विमा कंपनीकडे २७८ कोटी रुपये जमा झाले; परंतु, दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देताना मात्र केवळ ६१ कोटी ५२ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची पावसाअभावी उगवण होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यानंतर २०१०-११ पासून शेतकºयांनी आपली पिके संरक्षित करुन नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यास सुरुवात केली. २०१०-११ मध्ये २१ हजार ४३३ शेतकºयांनी पीक विमा भरला होता. त्यापैकी ११०३ शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. २०११-१२ मध्ये ७१ हजार ३०२ शेतकºयांनी विमा भरलेला असताना केवळ २४ हजार ३४८ शेतकºयांनाच मदत मिळाली. तर २०१२-१३ मध्ये २१ हजार ७९५ शेतक्यांनी विमा भरलेला असताना नुकसान भरपाई मात्र केवळ ४ शेतकºयांना मिळाली. २०१३-१४ मध्येही १५ हजार २८० शेतकºयांपैकी केवळ २४ शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकºयांमध्ये विमा कंपनीबद्दल नाराजी होती. त्यानंतर २०१४-१५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत केवळ २०१५-१६ या आर्थिक वर्षातच परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ लाख ८६ हजार ५३८ शेतकºयांना सर्वोच्च ४८८ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली; परंतु, त्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकºयांना मदत देताना वेगवेगळे निकष, अटी व नियमांवर बोट दाखवत आखडता हात घेतला. २०१८-१९ मध्ये तर इफको टोकियो विमा कंपनीने शेतकºयांकडून २८ कोटी ५८ लाख तर राज्य व केंद्र शासनाकडून अडीचशे कोटी असे २७८ कोटी जमा केले; परंतु शेतकºयांची मात्र केवळ ६१ कोटीवरच बोळवण केली.दोन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्यायच४२०१७-१८ या खरीप हंगामात ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ३१ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा भरला होता; परंतु, या कंपनीने केवळ जवळपास २ लाख शेतकºयांनाच नुकसान भरपाई दिली. चार लाख शेतकरी मदतीपासून वंचित ठेवले. याबाबत जिल्ह्यात २३ दिवस आंदोलने केली. या विम्याचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दारात जावूनही अद्यापही निकाली निघाला नाही.४तर दुसरीकडे २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही इफ्को टोकियो कंपनीने केवळ ६१ कोटी रुपयांवरच शेतकºयांची बोळवण केली. त्यामुळे राज्य शासन एकीकडे दुष्काळ जाहीर करीत असताना विमा कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या मर्जीप्रमाणेच मदत देऊन जिल्ह्यातील शेतकºयांवर एक प्रकारचे अन्यायच केला जात असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीGovernmentसरकार