शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

परभणी: विमा कंपनीने घेतले २७८ कोटी, दिले मात्र ६१ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:38 IST

खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली होती. त्यामुळे विमा कंपनीकडे २७८ कोटी रुपये जमा झाले; परंतु, दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देताना मात्र केवळ ६१ कोटी ५२ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली होती. त्यामुळे विमा कंपनीकडे २७८ कोटी रुपये जमा झाले; परंतु, दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देताना मात्र केवळ ६१ कोटी ५२ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची पावसाअभावी उगवण होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यानंतर २०१०-११ पासून शेतकºयांनी आपली पिके संरक्षित करुन नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यास सुरुवात केली. २०१०-११ मध्ये २१ हजार ४३३ शेतकºयांनी पीक विमा भरला होता. त्यापैकी ११०३ शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. २०११-१२ मध्ये ७१ हजार ३०२ शेतकºयांनी विमा भरलेला असताना केवळ २४ हजार ३४८ शेतकºयांनाच मदत मिळाली. तर २०१२-१३ मध्ये २१ हजार ७९५ शेतक्यांनी विमा भरलेला असताना नुकसान भरपाई मात्र केवळ ४ शेतकºयांना मिळाली. २०१३-१४ मध्येही १५ हजार २८० शेतकºयांपैकी केवळ २४ शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकºयांमध्ये विमा कंपनीबद्दल नाराजी होती. त्यानंतर २०१४-१५ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत केवळ २०१५-१६ या आर्थिक वर्षातच परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ लाख ८६ हजार ५३८ शेतकºयांना सर्वोच्च ४८८ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली; परंतु, त्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकºयांना मदत देताना वेगवेगळे निकष, अटी व नियमांवर बोट दाखवत आखडता हात घेतला. २०१८-१९ मध्ये तर इफको टोकियो विमा कंपनीने शेतकºयांकडून २८ कोटी ५८ लाख तर राज्य व केंद्र शासनाकडून अडीचशे कोटी असे २७८ कोटी जमा केले; परंतु शेतकºयांची मात्र केवळ ६१ कोटीवरच बोळवण केली.दोन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्यायच४२०१७-१८ या खरीप हंगामात ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकºयांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ३१ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा भरला होता; परंतु, या कंपनीने केवळ जवळपास २ लाख शेतकºयांनाच नुकसान भरपाई दिली. चार लाख शेतकरी मदतीपासून वंचित ठेवले. याबाबत जिल्ह्यात २३ दिवस आंदोलने केली. या विम्याचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दारात जावूनही अद्यापही निकाली निघाला नाही.४तर दुसरीकडे २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही इफ्को टोकियो कंपनीने केवळ ६१ कोटी रुपयांवरच शेतकºयांची बोळवण केली. त्यामुळे राज्य शासन एकीकडे दुष्काळ जाहीर करीत असताना विमा कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या मर्जीप्रमाणेच मदत देऊन जिल्ह्यातील शेतकºयांवर एक प्रकारचे अन्यायच केला जात असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीGovernmentसरकार