शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:51 IST

जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर येऊन ठेपते़ शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली असली तरी ठराविक पॉर्इंटवर हे कर्मचारी मोठ्या संख्येने थांबतात़ ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त वाहने जातात़ त्याच ठिकाणी हे कर्मचारी थांबत आहेत़ या उलट शहरातील बाजारपेठ भागात वाहतूक नियमांचे पदोपदी उल्लंघन होत असताना त्याकडे मात्र कर्मचाºयांची डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे़ मागील अनेक वर्षांपासून बाजारपेठेतील वाहतूक विस्कळीत झालेली आहे़ येथील नारायण चाळ, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ आदी भागांमध्ये दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे दिसून येते़ नारायण चाळ भागात दररोज वाहतुकीची कोंडी होते़ तर शनिवार बाजाराच्या दिवशी नानलपेठ कॉर्नर येथे ही अशीच परिस्थिती निर्माण होते़ विशेष म्हणजे या भागात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँकांची कार्यालये आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते़ शनिवार बाजारामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होते़ या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत़ नानलपेठ भागातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही सर्रास विरुद्ध मार्गाने शिवाजी चौकात वाहने येतात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ तसेच गुजरी बाजारातून कच्छी बाजाराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही या मार्गानेही अनेक वेळा वाहने दामटली जातात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ या संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचे रस्ते आहेत़ या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण वाढले आहे़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कारवाई होत नसल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत चालला आहे़ रस्ता सुरक्षा अभियानात तरी या प्रश्नांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र केवळ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने उचलून वसुली वाढविण्याचाच सपाटा लावल्याने वाहनधारकांमधून रोष व्यक्त केला जात आहे़पार्किंग नावालाचतीन महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठ भागात वाहन तळासाठी महापालिकेने जागा निश्चित केली होती़ मात्र अनेक भागांमध्ये या वाहनतळाचा वापरच होत नाही़ वाहनतळ वापरण्यासाठी देखील प्रयत्न होत नाहीत़सिग्नलचा प्रश्न कायमशहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी महापालिकने बसविलेले सिग्नल शोभेचे बनले आहेत़ बंद असलेले हे सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका दोन्ही विभाग प्रयत्न करीत नाहीत़ परिणामी ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च केला़ त्या उद्देशालाच फाटा दिला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParkingपार्किंग