शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:51 IST

जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर येऊन ठेपते़ शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली असली तरी ठराविक पॉर्इंटवर हे कर्मचारी मोठ्या संख्येने थांबतात़ ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त वाहने जातात़ त्याच ठिकाणी हे कर्मचारी थांबत आहेत़ या उलट शहरातील बाजारपेठ भागात वाहतूक नियमांचे पदोपदी उल्लंघन होत असताना त्याकडे मात्र कर्मचाºयांची डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे़ मागील अनेक वर्षांपासून बाजारपेठेतील वाहतूक विस्कळीत झालेली आहे़ येथील नारायण चाळ, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ आदी भागांमध्ये दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे दिसून येते़ नारायण चाळ भागात दररोज वाहतुकीची कोंडी होते़ तर शनिवार बाजाराच्या दिवशी नानलपेठ कॉर्नर येथे ही अशीच परिस्थिती निर्माण होते़ विशेष म्हणजे या भागात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँकांची कार्यालये आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते़ शनिवार बाजारामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होते़ या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत़ नानलपेठ भागातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही सर्रास विरुद्ध मार्गाने शिवाजी चौकात वाहने येतात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ तसेच गुजरी बाजारातून कच्छी बाजाराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही या मार्गानेही अनेक वेळा वाहने दामटली जातात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ या संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचे रस्ते आहेत़ या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण वाढले आहे़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कारवाई होत नसल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत चालला आहे़ रस्ता सुरक्षा अभियानात तरी या प्रश्नांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र केवळ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने उचलून वसुली वाढविण्याचाच सपाटा लावल्याने वाहनधारकांमधून रोष व्यक्त केला जात आहे़पार्किंग नावालाचतीन महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठ भागात वाहन तळासाठी महापालिकेने जागा निश्चित केली होती़ मात्र अनेक भागांमध्ये या वाहनतळाचा वापरच होत नाही़ वाहनतळ वापरण्यासाठी देखील प्रयत्न होत नाहीत़सिग्नलचा प्रश्न कायमशहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी महापालिकने बसविलेले सिग्नल शोभेचे बनले आहेत़ बंद असलेले हे सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका दोन्ही विभाग प्रयत्न करीत नाहीत़ परिणामी ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च केला़ त्या उद्देशालाच फाटा दिला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParkingपार्किंग