शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:51 IST

जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर येऊन ठेपते़ शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली असली तरी ठराविक पॉर्इंटवर हे कर्मचारी मोठ्या संख्येने थांबतात़ ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त वाहने जातात़ त्याच ठिकाणी हे कर्मचारी थांबत आहेत़ या उलट शहरातील बाजारपेठ भागात वाहतूक नियमांचे पदोपदी उल्लंघन होत असताना त्याकडे मात्र कर्मचाºयांची डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे़ मागील अनेक वर्षांपासून बाजारपेठेतील वाहतूक विस्कळीत झालेली आहे़ येथील नारायण चाळ, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ आदी भागांमध्ये दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे दिसून येते़ नारायण चाळ भागात दररोज वाहतुकीची कोंडी होते़ तर शनिवार बाजाराच्या दिवशी नानलपेठ कॉर्नर येथे ही अशीच परिस्थिती निर्माण होते़ विशेष म्हणजे या भागात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँकांची कार्यालये आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते़ शनिवार बाजारामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होते़ या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत़ नानलपेठ भागातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही सर्रास विरुद्ध मार्गाने शिवाजी चौकात वाहने येतात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ तसेच गुजरी बाजारातून कच्छी बाजाराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही या मार्गानेही अनेक वेळा वाहने दामटली जातात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ या संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचे रस्ते आहेत़ या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण वाढले आहे़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कारवाई होत नसल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत चालला आहे़ रस्ता सुरक्षा अभियानात तरी या प्रश्नांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र केवळ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने उचलून वसुली वाढविण्याचाच सपाटा लावल्याने वाहनधारकांमधून रोष व्यक्त केला जात आहे़पार्किंग नावालाचतीन महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठ भागात वाहन तळासाठी महापालिकेने जागा निश्चित केली होती़ मात्र अनेक भागांमध्ये या वाहनतळाचा वापरच होत नाही़ वाहनतळ वापरण्यासाठी देखील प्रयत्न होत नाहीत़सिग्नलचा प्रश्न कायमशहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी महापालिकने बसविलेले सिग्नल शोभेचे बनले आहेत़ बंद असलेले हे सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका दोन्ही विभाग प्रयत्न करीत नाहीत़ परिणामी ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च केला़ त्या उद्देशालाच फाटा दिला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParkingपार्किंग