शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:16 IST

जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणाहून पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रातील वाळू चांगल्या प्रतीची असल्याने या वाळूला जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी मागणी आहे; परंतु, या ठिकाणच्या वाळू घाटाचे लिलाव अद्याप तालुका प्रशासनाकडून करण्यात आले नाहीत; परंतु, वाळू माफियांनी जिंंतूर तालुक्यातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणी आपले पॉईंट तयार केले आहेत. येथून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक केली जाते. ही वाळू जिंतूर, मंठा, चारठाणा, सेलू, सेनगाव यासह अन्य ठिकाणी पोहचिती केल्या जाते. वझर या ठिकाणी तर महसूल पथकाचा अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नसल्याने बिनधास्तपणे वाळुचा उपसा करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री केल्या जात असल्याचे समोर आले आहे. महसूलचे पथक कार्यवाही करण्याच्या उद्देशाने निघाले तर पथक पोहचण्याअधीच वाळू माफियांनी खबर लागते व तेथून हे माफिया पोबारा होतात. या वाळू विक्रीतून मोठा पैसा मिळत असल्याने व कार्यवाहीची भिती राहिली नसल्याने वाळू माफियांनी अंबरवाडी येथे नवीन पॉर्इंट सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तीन महिन्यापूर्वी तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली होती. मात्र तहसीलदारांची कार्यवाही तोडकी पडल्यानेच बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. वझर येथे काही दिवसांपूर्वी वाळू माफियांवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवरही या माफियांनी हल्ला केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू