शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणी: अवैध वाळू उपशाने नदीपात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहेकाही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोनपेठ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात काही धाडसी कारवाया केल्या होत्या. या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र काही दिवसानंंतर अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका व पोहंडूळ येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी हे वाळू तस्कर अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, बीड, परळी या ठिकाणी अवैध वाळू विक्री करीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून वाळुची मागणी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने वाळू माफियांनी संधीचे सोने करण्यासाठी तालुक्यातील वाणीसंगम येथील नदीपात्रातून रात्र-दिवस वाळूचा उपसा सुरू केला आहे. नदीपात्रातून उपसलेल्या वाळुचे इतरत्र ठिकाणी मोठमोठे साठे निर्माण केले आहेत. पावसाळ्यात वाळूला असलेली मागणी लक्षात घेऊन वाळू माफिया सक्रिय झाले असून तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोहंडूळ या ठिकाणच्या नदीपात्रातून रात्रं-दिवस बेसुमार वाळू उपसा सुरू केल्याने गोदावरीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्याच बरोबर वाळू उपशाने नदीपात्राची चाळणी झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही आगामी काळात अवैध वाळू उपशामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीने वाळूमाफियांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे वाळू चोरीला चाप बसला होता. मात्र तालुका महसूल प्रशासनाकडून आता केवळ वाळू माफियांविरुद्ध बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.माफियांची अधिकाºयांवर पाळतसोनपेठ तालुक्यातील पाच ते सहा गावांतील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूमाफिया महसूलच्या अधिकारी व कर्मचाºयांवर मोबाईलच्या सहाय्याने पाळत ठेवत आहेत. वाणीसंगमकडे जाणाºया रस्त्यांवर काही माफियांनी रोजंदारीवर माणसेही नेमली आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी नदीपात्राकडे किंवा गावामध्ये येण्याची चाहूल लागताच माफियांना मोबाईलद्वारे माहिती देत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.सोनपेठ तालुक्यातील नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपशावर जिल्हाधिकाºयांनी अंकुश ठेवला होता; परंतु, महसूल प्रशासनाकडून होणारी कारवाई थातूरमातूर असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून होणाºया कारवाईची धार वाढवावी, अशी मागणी वाणीसंगम येथील ग्रामस्थांमधून सातत्याने केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू