शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

परभणी : तंत्रज्ञानाचा वापर नियोजनबद्ध केल्यास फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:19 IST

कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ़ गोखले बोलत होते़ यावेळी मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉ़ सय्यद इस्माईल, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य शरद हिवाळे, डॉ़ स्मिता सोळंके, पुणे येथील संजय देशमुख, डॉ़ सतीश भोंडे, महेश सोनकुळ, डॉ़ आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गोखले म्हणाले, शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत़ त्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक आणि बाजारभावातील चढउतार या प्रमुख समस्या आहेत़ शेतकºयांनी योग्य बियाणे, अंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, युवा शेतकºयांनी शेतीमध्ये पुढे यावे, त्यांच्यातील उर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल़ विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये बाजार व्यवस्थापन महत्त्वाचे असून, बाजारपेठेचा अभ्यास करून सेंद्रीय शेतीत यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले़दिवसभराच्या तांत्रिक सत्रामध्ये पुणे येथील संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी कीटकांचे व सापळ्यांचे फायदे, डॉ़ सतीश भोंडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, डॉ़ सी़व्ही़ आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ़ ए़टी़ शिंदे यांनी पशूधन व्यवस्थापन आणि डॉ़ ए़एल़ धमक यांनी जैविक खताची निर्मिती, उपयोग आदीविषयी माहिती दिली़ यावेळी जैविक खत निर्मिती केंद्रास भेट देऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले़ मनीषा वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले़ अभिजीत कदम यांनी आभार मानले़कार्यक्रम यशस्वीतेसाठी संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद गायकवाड, डॉ़ सुनील जावळे, शीतल उफाडे, द्वारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतीश कटारे, भागवत वाघ आदींनी प्रयत्न केले़एकत्र काम केल्यास खर्चात बचत४सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून, त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल, असे सांगून सेंद्रीय शेतीचे तंत्रज्ञान शेतकºयांना सांगितले़ डॉ़ सय्यद इस्माईल म्हणाले, रासायनिक खते व कीटक नाशकांच्या वापराचा अतिरेक झाल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होतो़ तसेच जमिनीचे आरोग्यही बिघडते़ यामुळे दुहेरी नुकसान होते़ सेंद्रीय शेतीमध्ये निविष्ठांवरील खर्च कमी करता येतो, असे सांगून नेमक्या कोणत्या निविष्ठा वापराव्यात आणि कोणत्या नाही, याची माहिती त्यांनी दिली़ मराठवाडा विभागात सेंद्रीय शेतीचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी