शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

परभणी : शासकीय विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:46 IST

शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.परभणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित शनिवार बाजार येथील निजामकालीन विश्रामगृह तसेच वसमतरोडवरील नव्याने बांधकाम झालेले सावली विश्रामगृह अशा दोन विश्रामगृहांचा समावेश आहे. त्यापैकी शनिवार बाजारातील विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दोन वर्षांपासून या विश्रामगृहाचा वापरही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे अधिकारी, पदाधिकारी आणि इतर पाहुणे मंडळींना सावली विश्रामगृहामध्येच निवारा द्यावा लागत आहे. परभणी शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.प्रत्येक महिन्यात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात. त्यामुळे पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधून परभणीत कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार बाजारातील विश्रामगृह बंद पडल्याने अनेक वेळा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची खाजगी हॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागते.शनिवार बाजार भागातील शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. शहरामध्ये सावली विश्रामगृहाची उभारणी झाल्यानंतर जुन्या विश्रामगृहाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी या विश्रामगृहाच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भर पडली. सध्या या विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे.समोरील बाजुने आरसीसी बांधकाम असले तरी पाठीमागील बाजू जुन्या बांधकामाची आहे. विश्रामगृहातील खोल्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकाश व्यवस्थेची वायरिंग जागोजागी उखडली असून फर्निचरची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. त्यामुळे दोन वर्षापासून या विश्रामगृहाचा वापर बंद करण्यात आला आहे. एैसपैस जागा आणि सुविधा असतानाही शहराच्या मध्यवस्तीत असलेले हे विश्रामगृह ओस पडले आहे.बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन विश्रामगृहाची दुरुस्ती करुन ते वापरण्यायोग्य करावे, अशी मागणी होत आहे.दुसºया फळीतील कार्यकर्त्यांची गोची४सावली विश्रामगृहामध्ये अति महत्त्वांच्या व्यक्तींसाठी निवासाची व्यवस्था केली जाते. याशिवाय या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी चार कक्ष उपलब्ध आहेत. मात्र ते अपुरे पडतात. अनेक वेळा बाहेरगावाहून येणाºया अति महत्त्वाच्या व्यक्तींसोबत येणाºया इतर व्यक्तींची निवासाची व्यवस्था होत नाही. अशा दुसºया फळीतील पाहुण्यांसाठी शनिवार बाजारातील विश्रामगृह सोयीचे ठरत होते. मात्र या विश्रामगृहाचीच दुरवस्था झाल्याने गैरसोयीत भर पडली आहे.इमारत पाडण्याची मागितली परवानगीशनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शासकीय विश्रामगृहाची इमारत जुनी झाल्याने ती पाडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी साबां उपविभागाने केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्यांना २१ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र पाठवून निजामकालीन असलेल्या या इमारतीचा वापर बंद ठेवावा, असे सूचित केले आहे. तेव्हापासून हे विश्रामगृह बंद अवस्थेत आहे.निवास खोल्या कुलूपबंद अवस्थेतशासकीय विश्रामगृहाच्या परिसरात काही निवासी खोल्याही उपलब्ध आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या खोल्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार बाजारातील शासकीय विश्रामगृह केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले असून कधीकाळी अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान असलेली ही वास्तू सध्या मात्र भनान अवस्थेत उभी आहे.गार्डनचीही दुरवस्था४येथील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी गार्डन विकसित केले होते. झाडे लावून विश्रामगृह परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. सध्या मात्र या गार्डनची दुरवस्था झाली आहे. परिसरातील लॉन पूर्णत: वाळून गेली असून काही झाडेही वाळली आहेत. गार्डनच्या सुशोभिकरणाकडेच बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. किमान या भागातील गार्डनची निगा राखली असती तर हा परिसर आणखी आकर्षक दिसला असता. तेव्हा किमान गार्डनचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी