शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

परभणी : १२१ पीडित मुलींचे मनोधैर्य वाढविण्यास शासनाचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:10 IST

मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे पडून आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे पडून आहेत़अत्याचार पीडित महिला, बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने २ आॅक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली़ या योजनेंतर्गत बलात्कार, बाल लैंगीक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला झालेल्या पीडित मुलींसाठी मनोधैर्य योजनेंतर्गत २ ते ३ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य करण्यात येते़ या कार्यालयाकडे २०१३ ते २०१७ पर्यंत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी ५६ प्रस्ताव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन असलेल्या समितीच्या वतीने नामंजूर करण्यात आले़ त्यामुळे १९० प्रकरणांपैकी १३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली़ १३४ पैकी १२१ प्रस्तावांना अर्थसहाय्य देण्यात आले़ यामध्ये २०१३ ते २०१४ या आर्थिक वर्षात बाल लैकींग अत्याचाराचे एक प्रकरण दाखल झाले होते़ हे प्रकरण मंजूर करून अर्थसहाय्य करण्यात आले़ २०१४-१५ या वर्षात बलात्कार, बाल लैंगीक अत्याचार असे एकूण ७५ प्रकरणे दाखल झाली होती़ त्यापैकी ४१ मंजूर करण्यात आली व त्यातील ४० प्रकरणांतील पीडितांना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर एक प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित आहे़ २०१५-१६ या वर्षात ४६ प्रकरणे महिला व बालकल्याण कार्यालयाकडे दाखल झाले होते़ त्यापैकी ३२ मंजूर झाले़ त्यातील ३१ प्रकरणांतील पीडितांना कमीत कमी २ व जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात आले़ एक प्रस्ताव अपूर्ण असल्याने प्रलंबित आहे़ २०१६-१७ या आर्थिक वर्षांत ४० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यातील ३६ प्रस्तावांना मंजुरी देऊन ३१ पीडितांना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर ५ प्रस्ताव पीडितांचा ठावठिकाणांचा न लागल्याने व कागदपत्रांत त्रुटी असल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़ जून २०१७ पर्यंत या विभागाकडे २८ प्रकरणे दाखल झाले होते़ त्यापैकी २४ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर १८ प्रकरणांना अर्थसहाय्य करण्यात आले व सहा प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़२०१३ ते २०१७ या कालावधीत १२१ प्रकरणांतील पीडितांना २ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली़