शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरी बसस्थानकाला आले तळ्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:27 IST

बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.पाथरी येथे राष्ट्रीय स्वरुप ६१ या रस्त्यावर बसस्थानक आहे. पाथरी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यांसाठी याच ठिकाणी मुख्य आगार आहे. याच आगारातून तीन्ही तालुक्यातील एस.टी.महामंडळाच्या बसेसचे नियोजन केले जाते. पाथरी येथील बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच बसस्थानकाची दुरवस्था दिसून येते. बाहेरुन येणाºया बसगाड्या ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये मागील आठ दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे मोठे पाणी साचले आहे. परिणामी बसस्थानक परिसर चिखलमय झाला आहे. बसस्थानकात बसगाडीने प्रवेश करताच प्रवाशांना दुरवर जावे लागत आहे. जेणेकरुन चिखल अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्याच बरोबर अनेक वेळा प्रवासी पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे बेजार आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातून पाथरी शहरात येणाºया शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मानव विकासच्या बसमधून जवळपास ७०० मुली शिक्षणासाठी शहरात येतात. तसेच विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने दररोज तीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी बसने शहरात दाखल होतात. या विद्यार्थ्यांना बसस्थानकावरील साचलेले पाणी व चिखलातून मार्गक्रमण करुन बसस्थानकाबाहेर पडावे लागत आहे.त्यामुळे विभागीय नियंत्रकांनी याकडे लक्ष देऊन अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बसस्थानक परिसराची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, शालेय विद्यार्थी व तालुकावासियांतून होत आहे.बसचालकांना करावी लागते कसरत४राष्ट्रीय महामार्ग ६१ हा रस्ता शहरातून जातो. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत व त्यावर जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.४बसस्थानकातून बस बाहेर पडताना दुभाजक बसविण्यात आल्याने प्रत्येक बस ही विरुद्ध दिशेने न्यावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बसस्थानकातील गाड्या पाण्यातून बाहेर काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.बसस्थानक परिसराच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. विभागीय पातळीवरुन त्या कामाची निविदा निघालेली असल्याने हे काम लवकरच सुरु होईल.-एल.एम.चौरे, आगारप्रमुख

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस