शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

परभणी : पाथरी बसस्थानकाला आले तळ्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:27 IST

बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.पाथरी येथे राष्ट्रीय स्वरुप ६१ या रस्त्यावर बसस्थानक आहे. पाथरी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यांसाठी याच ठिकाणी मुख्य आगार आहे. याच आगारातून तीन्ही तालुक्यातील एस.टी.महामंडळाच्या बसेसचे नियोजन केले जाते. पाथरी येथील बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच बसस्थानकाची दुरवस्था दिसून येते. बाहेरुन येणाºया बसगाड्या ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये मागील आठ दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे मोठे पाणी साचले आहे. परिणामी बसस्थानक परिसर चिखलमय झाला आहे. बसस्थानकात बसगाडीने प्रवेश करताच प्रवाशांना दुरवर जावे लागत आहे. जेणेकरुन चिखल अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्याच बरोबर अनेक वेळा प्रवासी पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे बेजार आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातून पाथरी शहरात येणाºया शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मानव विकासच्या बसमधून जवळपास ७०० मुली शिक्षणासाठी शहरात येतात. तसेच विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने दररोज तीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी बसने शहरात दाखल होतात. या विद्यार्थ्यांना बसस्थानकावरील साचलेले पाणी व चिखलातून मार्गक्रमण करुन बसस्थानकाबाहेर पडावे लागत आहे.त्यामुळे विभागीय नियंत्रकांनी याकडे लक्ष देऊन अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बसस्थानक परिसराची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, शालेय विद्यार्थी व तालुकावासियांतून होत आहे.बसचालकांना करावी लागते कसरत४राष्ट्रीय महामार्ग ६१ हा रस्ता शहरातून जातो. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत व त्यावर जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.४बसस्थानकातून बस बाहेर पडताना दुभाजक बसविण्यात आल्याने प्रत्येक बस ही विरुद्ध दिशेने न्यावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बसस्थानकातील गाड्या पाण्यातून बाहेर काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.बसस्थानक परिसराच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. विभागीय पातळीवरुन त्या कामाची निविदा निघालेली असल्याने हे काम लवकरच सुरु होईल.-एल.एम.चौरे, आगारप्रमुख

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस